Water Conservation: बेलपाडा, गायधोंड गावांत पाण्यातून आली समृद्धी

Village Development: बेलपाडा आणि गायधोंड या नाशिक जिल्ह्यातील आदिवासी गावांमध्ये स्वदेस फाउंडेशनच्या सहकार्याने शेततळ्यांची निर्मिती झाली आहे. यामुळे शाश्वत शेतीला चालना मिळाली असून, जलसंधारणाची क्रांती घडून गावांत समृद्धी आली आहे.
Farming Innovation
Farming InnovationAgrowon
Published on
Updated on

Nashik News: नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागातील पेठ तालुक्याच्या आदिवासी क्षेत्रात बेलपाडा व गायधोंड या डोंगराळ गावांत स्वदेस फाउंडेशनच्या सहकार्याने शेततळी निर्मिती करण्यात आली आहेत. येथे जलसंधारणाची क्रांती घडून या दोन गावांत शेततळ्यांच्या माध्यमातून पाण्यातून समृद्धी आल्याचे पाहायला मिळत आहे. येथे भाजीपाला व फुलशेती होत असून शाश्वत शेतीला चालना मिळाली आहे.

आदिवासी क्षेत्राचा विकास साधण्यासाठी रॉनी स्क्रूवाला व झरीना स्क्रूवाला यांच्या स्वदेस फाउंडेशनमार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील इगतपुरी, पेठ, सुरगाणा व त्र्यंबकेश्वर तालुक्यांमध्ये ग्रामीण सक्षमीकरणाचे काम सुरू आहे. गाव विकास समितीच्या माध्यमातून ‘स्वप्नातील गाव’ संकल्पनेची अंमलबजावणी होत आहे. ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांना उपजीविकेची साधने स्थानिक पातळीवर उपलब्ध व्हावीत यासाठी विशेष प्रयत्न सुरू असल्याची माहिती ‘स्वदेस’चे संचालक तुषार इनामदार यांनी दिली.

Farming Innovation
Water Conservation Project : पाणी शेतातच मुरवणारा ‘जलतारा’

पेठ तालुक्यातील बेलपाडा व गायधोंड या गावांमध्ये शेततळ्यांच्या माध्यमातून शाश्वत शेतीस चालना मिळाली आहे. त्यातून शेतकऱ्यांचे उत्पन्नही हळूहळू वाढू लागले आहे. जुलै २०२४ मध्ये बेलपाडा गावातील शेततळ्यांचे काम पूर्ण होऊन ३० शेतकऱ्यांच्या उपयोगासाठी ‘हनीवेल’ कंपनीच्या आर्थिक सहकार्याने १० शेततळी बनविण्यात आली. प्रत्येकी शेततळ्याचा वापर ३ शेतकरी मिळून करत असून ३ एकर क्षेत्र ठिबक सिंचनाद्वारे सिंचित केले जात आहे.

Farming Innovation
Water Conservation: जलसंधारणाच्या कामांना तत्काळ मान्यता द्या: जितेंद्र डुडी

७ शेततळी भाजीपाला शेतीसाठी, तर ३ शेततळी नव्याने बागायती लागवडीसाठी वापरण्यात येत आहेत. टोमॅटो व काकडीची मोठ्या प्रमाणावर लागवड झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. गावकऱ्यांनी आपल्या गावाची नवी ओळख ‘शेततळ्यांचे गाव’ अशी निर्माण केली आहे.

भाजीपाला शेतीबरोबरच मोगरा व सोनचाफा फुलशेतीलाही येथे गती मिळाली असून, गाव आता ‘सुगंधी गाव’ म्हणून परिचित होऊ लागले आहे. प्रकल्पाला गाव विकास समिती गायधोंड व बेलपाडा या बरोबरच ‘स्वदेस’चे वरिष्ठ संचालक बिजॉय चिरामल, संचालक नीता हरमलकर व उपमहाव्यवस्थापक वैभव पवार, उपमहाव्यस्थापक मनोज अहिरे, व्यवस्थापक संदीप देवमोरे, शीतल डांगे, राहुल ब्राह्मणे, समीर शेख, विजय पडोळे, कोमल माने व समन्वयक रमेश बंजारा व रमेश चव्हाण यांचे सहकार्य लाभले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com