.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Mumbai News : पालघर, ठाणे जिल्ह्यांतील मच्छीमार संस्थांनी घेतलेल्या निर्णयानुसार १५ ऑगस्टपासून मासेमारीसाठी मच्छीमार समुद्रात जाणार आहेत. त्याच्या तयारीसाठी सध्या मच्छीमारांची एकच धावपळ सुरू झाली आहे, मात्र हा निर्णय मान्य न झालेल्या उत्तनमधील काही मच्छीमार याआधीच मासेमारीसाठी रवाना झाले आहेत.
सरकारी आदेशानुसार १ ऑगस्टपासूनच मासेमारीचा हंगाम सुरू झाला आहे; परंतु समुद्रातील मासळीच्या साठ्याचे जतन करण्यासाठी पालघर, ठाणे जिल्ह्यातील मच्छीमार संस्थांनी एकमताने १५ ऑगस्टपासूनच मासेमारी सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानुसार उत्तनमधील मच्छीमार हंगामाच्या स्वागतासाठी तयार झाला असून मासेमारीला निघण्याच्या तयारीत व्यग्र झाला आहे. दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर मासेमारी नौका समुद्रात उतरविण्यात आल्या आहेत. त्यावर मासेमारीसाठी लागणारी जाळी, अन्नधान्य, बर्फ, पिण्याचे पाणी, डिझेल आदी सामान चढविण्यात येत आहे.
या तयारीसाठी चार ते पाच दिवस लागतात.
मासेमारीसाठी गेल्यानंतर मच्छीमारांचा दहा ते बारा दिवस समुद्रातच मुक्काम असतो. या एका फेरीसाठी त्यांना सव्वा ते दीड लाखाचा खर्च येतो. त्यामुळे पुरेशी मासळी मिळाली नाही तर हा मुक्काम आणखी चार ते पाच दिवस वाढण्याची शक्यतादेखील असते. त्यानुसार मच्छीमारही तयारी करतात.
काही नाैका समुद्रात रवाना
१५ ऑगस्टला सकाळीच मच्छीमार समुद्रात प्रयाण करणार आहेत. उत्तन व पालघर जिल्ह्यातील बहुतांश मच्छीमार १५ ऑगस्टलाच समुद्रात जाणार असले, तरी उत्तनमधील काही मच्छीमार अजून वाट न बघता ४ आणि ५ ऑगस्टलाच समुद्रात मासेमारीसाठी गेल्याची माहिती मच्छीमारांनी दिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.