
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर घाटनांद्रासह परिसरात शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या पूर्व हंगामी मिरची पिकाला सध्या पडत असलेल्या पूर्व मोसमी पावसाचा चांगला फायदा होत असल्याचे या भागातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. सध्या या परिसरात मिरचीचे पीक जोरदार आले असून मिरचीचे उत्पादन देखील निघायला सुरुवात झाली आहे.
घाटनांद्रा परिसर हा मिरचीसाठी प्रसिद्ध आहे. आपल्या उत्पन्नात अधिक वाढ व्हावी व पारंपारिक पिकातून देखील अपेक्षित उत्पादन हाती लागत नसल्याने मागील वीस वर्षांपासून या भागातील शेतकरी मिरची पिकाकडे वळले आहेत. कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे पीक म्हणून दरवर्षी शेतकरी आपल्या विहिरीमध्ये पाण्याचे योग्य प्रमाणात नियोजन करून जमेल त्या पद्धतीने मिरचीची लागवड करत आहेत.
बरेच शेतकरी सुरुवातीला चांगला भाव हाती लागेल या अपेक्षेपोटी मार्च, एप्रिल महिन्यातच उपलब्ध पाण्यावर उन्हाळी मिरची लागवड करतात. त्याचे फलित देखील शेतकऱ्यांना दरवर्षी पाहायला मिळत आहे. या वर्षी देखील घाटनांद्रासह परिसरात पेडगाव, चारणेरवाडी, धारला आदी भागातील शेतकऱ्यांनी उन्हाळी मिरचीची लागवड केली आहे.
मध्यंतरी लागवड केलेल्या मिरचीच्या कोवळ्या रोपाला ४२ ते ४३ डिग्री सेल्सिअस तापमानाचा फटका सहन करावा लागला. त्यामुळे अनेक भागातील मिरची रोपे उन्हापासून करपून गेली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.