
Jalgaon News: खानदेशात पपईची लागवड सुरूच आहे. यंदा क्षेत्र विक्रमी म्हणजेच १५ हजार हेक्टरवर पोचले आहे. पपई लागवड जूनमध्येच थांबली आहे. आता शेतकरी पुढील हंगामातील लागवडीच्या नियोजनात आहेत.
पपईसाठी नंदुरबार जिल्हा आघाडीवर असून, २०२३-२४ मध्ये जिल्ह्यात पाच हजार २०० हेक्टरवर पपईची लागवड होती. तर २०२४-२५ मध्ये ही लागवड सुमारे चार हजार हेक्टरवर होती. यंदा किंवा २०२४-२५ मध्ये नंदुरबारमधील लागवड सात हजार हेक्टरपर्यंत आहे. शहादा तालुक्यातील लागवड साडेपाच हजार हेक्टरवर झाली आहे.
जळगाव जिल्ह्यात सुमारे सहा हजार हेक्टर आणि धुळ्यातही सुमारे दोन हजार हेक्टरवर लागवड झाली आहे.कमी पाऊस व नैसर्गिक समस्या यामुळे मागील वेळेस पपईचे उत्पादन कमी आले. रोपांची टंचाईही होती.
यामुळे अनेक शेतकरी वेळेत लागवड करू शकले नाहीत. यामुळे उत्पादन डिसेंबरमध्ये सुरू झाले. २०२४-२५ मध्ये पपईला दरही चांगले होते. यामुळे या हंगामात लागवडीत मोठी वाढ झाली आहे.
कापासाऐवजी पपई
खानदेशात पपईखालील क्षेत्र १० ते ११ हजार हेक्टरपर्यंत असायचे. पण लागवडीत यंदा वाढ झाली आहे. कापूस पिकात हानी होत आहे. केळी, भाजीपाला पिकांत जोखीम आहे. यामुळे शेतकरी पपई लागवड वाढवीत आहेत. ७८६ व १५ नंबर वाणांची लागवड केली जाते. त्यात ७८६ वाणावर रोगराई वाढत असल्याने गत हंगामात १५ नंबर वाणाला पसंती मिळाली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.