
Sindhudurg News : जिल्ह्यातील सोनाळीतील (ता. वैभववाडी) दोन तर मुसरे (ता. मालवण) येथील एक असे तीन गोठे पूर्णतः जळाले आहेत. यामध्ये चार जनावरे होरपळली आहेत. यात शेतकऱ्यांचे गुरांच्या वैरणीसह लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यातील सोनाळी वाणीवाडी येथील शेतकरी हरिश्चंद्र बोभाटे आणि रूपेश बोभाटे या दोन शेतकऱ्यांचे गोठे जवळजवळ आहेत. या गोठ्यांना रविवारी (ता. १) आग लागली. गोठ्यामध्ये गवत असल्यामुळे अवघ्या काही क्षणात आगीचा भडका उडाला. आग लागल्याचे लक्षात येताच बोभाटे कुटुंबातील सर्व सदस्य आणि स्थानिकांनी दोन्ही गोठ्यांतील २५ जनावरांना सुरक्षित बाहेर काढले.
स्थानिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला परंतु गवतामुळे आग आटोक्यात आली नाही. अखेर वैभववाडी नगरपंचायतीचा अग्निशामक बंबाला पाचारण करण्यात आले. बंबाच्या साहाय्याने आग विझविण्यात आली.
परंतु तोपर्यंत गोठ्यांचे छप्पर, गोठ्यात ठेवलेली वैरण पूर्णपणे जळाली होती. दोन्ही गोठ्यांचे मिळून दोन ते तीन लाखांचे नुकसान झाले. दोन गोठ्यांमधील २५ गुरे होती त्यांना वाचविण्यात यश आले. मालवण तालुक्यातील मसुरे येथील कावावाडी येथील मंदार मुणगेकर यांच्या गोठ्यालादेखील आग लागली.
रात्री साडेआठच्या सुमारास ही आग लागल्यामुळे लक्षात आली नाही. लक्षात आल्यानंतर जनावरांना बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला परंतु चार जनावरे आगीत होरपळली. स्थानिकांनी ही आग विझविण्याचा प्रयत्न केला परंतु तत्पूर्वी गोठा पूर्णतः जळून गेला. यात श्री. मुणगेकर यांनी ठेवलेले वैरण आणि साहित्य खाक झाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.