Mango Farming: फळगळतीमुळे आंबा बागायतदार शेतकरी संकटात

Vikramgad Mango Crisis: विक्रमगड तालुक्यात आंबा बागायतदारांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. हवामान बदलाच्या फटक्याने यंदा ६० टक्के झाडांना मोहरच न आल्याने उत्पादन घटण्याची भीती आहे.
Mango Crisis
Mango CrisisAgrowon
Published on
Updated on

Mumbai News: मागील १० ते १५ वर्षांपासून विक्रमगड तालुक्यात मोठ्या प्रमाणात आंब्याचे उत्पन्न घेतले जात आहे. येथील गावठी हापूस, केसर, लगंडा, पायरी आदी जातीच्या आंब्यांना मोठी मागणी असते. उत्पादित आंबा हा विक्रमगड बाजारपेठेतच संपत असतो. यातून शेतकरीवर्गाला चांगले उत्पन्न मिळते; मात्र यंदा वातावरण बदलाच्या परिणामामुळे ६० टक्के झाडांना मोहरच आलेला नाही.

तर काही झाडांना उशिराने जानेवारीत मोहर आला होता. त्यातून आंब्याचे उत्पन्न थोडे-फार प्रमाणात हाती येईल अशी अपेक्षा होती; मात्र पुन्हा निसर्गाच्या लहरीपणामुळे पाच ते सहा दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर फळे गळून पडत आहेत.

Mango Crisis
Mango Market: अमरावती बाजार समितीत आंबा आवक ५०० क्‍विंटलवर

आंबा पीक हे वर्षातील नगदी पीक असल्याने शेतकरीवर्गास दोन पैसे हातात मिळतात; मात्र यंदा हवामानाच्या फटक्याने आंबा उत्पादनापासून शेतकरी वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे कृषी विभागाने तातडीने सर्व्हे करून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत. तसेच आंबा उत्पादित शेतकरी वर्गाला नुकसानभरपाई तातडीने मिळावी. तसेच आंबा फळ पीकविमा योजनेत विक्रमगड तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना समाविष्ठ करून घ्यावे, अशी मागणी केली जात आहे.

मोहर करपला

मागील काही दिवसांत वातारणात सकाळी, रात्री गारवा तर दुपारी अचानक उष्णतेत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. वातारण असे होत असल्याने यंदाच्या आंबा हंगामावर परिणाम झाल्याने मोहोर करपला. काही झाडांना लहान फळधारणा झाली; मात्र त्यालाही गळती लागल्याने एकंदरीत या सर्वाचा परिणाम आंबा उत्पादनावर झाला आहे. यंदाचा आंबा हंगाम लांबवणीवर गेल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याचे आंबा बागायदारांकडून सांगण्यात येत आहे.

Mango Crisis
Mango Farming: नवीन अतिघन लागवडीमध्ये घ्यावयाची काळजी
पाच ते सहा दिवसांत वातावरणात मोठा बदल झाला आहे. दुपारी अचानक मोठ्या प्रमाणात उष्णतेत वाढ होत आहे. ४० सेल्सिअसच्या वरती तापमान जात आहे. याचा फटका आंबा पिकाला बसला आहे.
शिवम मेहता, आंबा बागायतदार, वाकडूपाडा
ढगाळ वातावरणामुळे मोहर करपला. आता अति उष्णतेमुळे मोठ्या प्रमाणात फळगळती होऊ लागली आहे. बागायतदार हवालदिल झाला आहे.
मुकेश हारड, आंबा बागायतदार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com