Water Management : राज्यात उद्यापासून ‘जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’

Water Conservation : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून जलसंपदा विभागामार्फत १५ ते ३० एप्रिल कालावधीत ‘जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’ साजरा केला जाणार आहे.
Water Management
Water Management Agrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : जलसंपदा विभाग हा महत्त्वाचा विभाग आहे. या विभागाशी सर्व यंत्रणा, नागरिक, शेतकरी व अन्य घटक जोडले गेले आहेत. त्यामुळे जलव्यवस्थापन कृती पंधरवड्यात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाच्या माध्यमातून जलसंपदा विभाग अधिक लोकाभिमुख करून महामंडळाच्या सक्षमीकरणासाठी मिशन मोडवर काम करणार आहे. सिंचन व्यवस्था अधिक प्रभावीपणे होण्यासाठी १५ एप्रिलपासून राज्यात ‘जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’ उपक्रम राबवला जाणार आहे.

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून जलसंपदा विभागामार्फत १५ ते ३० एप्रिल कालावधीत ‘जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’ साजरा केला जाणार आहे. त्याबाबत मंत्री विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच आढावा बैठक झाली. दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी व जलसंपदा विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते. ‘जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’ उपक्रमातून जलसाक्षरतेसाठी विविध उपक्रम राबवून जल व्यवस्थापनावर अधिक भर दिला जावा.

Water Management
Water Conservation : आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पाण्याचे संवर्धन करा

लोकाभिमुख कार्यक्रमाच्या माध्यमातून विभागाची वेगळी ओळख निर्माण झाली पाहिजे या पद्धतीने जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. कालवे स्वच्छ आणि प्रवाही राहिल्यास पाण्याचा कार्यक्षम वापर होऊन शेवटच्या घटकाला पाणी उपलब्ध होईल आणि त्यामुळे जनसामान्यात शासनाची प्रतिमा उंचावेल. या कामात स्थानिक प्रशासन आणि नागरिक यांचाही सहभाग घेऊन जलव्यवस्थापनाच्या प्रक्रियेला गती देण्यात येईल.

Water Management
Water Conservation : ‘जलतारा’मुळे दोन पावसाच्या हंगामातच पाणीपातळी वाढते

जलसंपदा विभागाच्या ताब्यात असणाऱ्या मालमत्तांची मोजणी करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. या जागांची सातबारावर नोंदणी करून घ्यावी. यासाठी ॲक्शन प्लॅन करण्यात यावा. जलसंपदा विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी मोहीम स्वरूपात काम करावे. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार पाणी वापर ठरला असून त्यानुसार पाणी वापराचे ऑडिट करून घ्यावे. पाण्याची गळती रोखण्यासाठी नगरपालिका, महानगरपालिका आणि आणि क्षेत्रीय स्तरावर उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.

जलसंधारण पंधरवड्यातील उपक्रम

- कालव्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवडीची मोहीम

- जिल्ह्यातील उद्भवातून अनधिकृतपणे पाणी उपशाबाबत माहिती संकलित करणे.

- कालव्यांवरील अतिक्रमणे काढण्यास प्राधान्य.

- जलसंपदा विभागाच्या मालमत्ता मोजणीसाठी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर.

- जलसंपदा विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण.

- शेतकरी, पाणी वापर संस्था संवाद, थकित पाणीपट्टी वसुली.

- जल व्यवस्थापनासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग, अनधिकृतपणे पाणी वापर रोखणे, सांडपाण्याचा पुनर्वापर.

सिंचन व्यवस्था अधिक प्रभावीपणे होण्यासाठी ‘जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’ उपक्रम राबवले जाणार आहे. सर्व घटकांतील लोकांचा यातसहभाग महत्त्वाचा आहे. स्वयंसेवी संस्थांची मदतही महत्त्वाची असेल.
- राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री जलसंपदा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com