Ai in Farming: खरिपातील ‘एआय’ची अंमलबजावणी तीन टप्प्यांत

Mobile App: खरीप हंगामांतील पिकांसाठी एआयचा वापर करण्यासाठी कृषी माहितीसाठी एकच खिडकी आणि शेतकऱ्यासाठी एकच मोबाइल ॲप तयार करण्यात येणार असून, तीन टप्प्यांत त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
Agriculture App
Agriculture AppAgrowon
Published on
Updated on

Mumbai News: खरीप हंगामांतील पिकांसाठी एआयचा वापर करण्यासाठी कृषी माहितीसाठी एकच खिडकी आणि शेतकऱ्यासाठी एकच मोबाइल ॲप तयार करण्यात येणार असून, तीन टप्प्यांत त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. अल्प मुदत टप्पा, मध्यम आणि दीर्घकालीन टप्पा २०२७ पर्यंतच्या खरीप हंगामापर्यंत टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे.

राज्यातील मोठ्या संख्येने असलेल्या अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी तसेच बहुभूधारक आणि बागायती शेतकऱ्यांना शेतीतील जोखीम कमी करण्यासाठी डिजिटल तंत्राज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शेतकऱ्यांना विविध प्रकारची अद्ययावत माहिती सहज समजेल अशा स्वरूपात निरंतर उपलब्ध करून देण्यासाठी आणि सध्या उपलब्ध असलेल्या डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करणे अपेक्षित आहे.

Agriculture App
Agri App: ‘ॲप’ने अडचणी दूर होतील?

डिजिटल तंत्रज्ञान आधारित कृषी माहितीसाठी एकच खिडकी म्हणजेच एसएआय तसचे शेतकऱ्यांसाठी एकच मोबाइल ॲप तयार करण्याच्या उद्देशाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (पोकरा) संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली होती.

या समितीने शेतकऱ्यांसाठी मोबाइल ॲप शक्य तितक्या लवकर विकसित करण्यासाठी जलद कृती गटाची स्थापना केली आहे. मात्र काही सुविधा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यास थोडा कालावधी लागणार आहे. त्यासाठी तीन टप्पे ठरविण्यात आले आहेत. अल्प मुदतीचा टप्पा खरीप २०२५ पर्यंत राबविण्यात येणार आहे. यामध्ये सध्या उपलब्ध असलेले हवामान अंदाज, पिकांचे व्यवस्थापन, जमीन व्यवस्थापन, विद्यापीठांद्वारे विकसित तंत्रज्ञान आणि अनुदान योजनांची माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येणार आहे.

Agriculture App
Ai in Agriculture: ‘एआय’चा वापर फळबागेत करा: उपमुख्यमंत्री अजित पवार

मध्यम मुदतीचा टप्पा २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. यामध्ये कृषी विभागाची महाडीबीटी, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची डीबीटी आणि ॲग्रीस्टॅक योजना, ऑनबोर्ड करणे, सुदूर संवेदन आणि इंटरनेट आधारित सल्ला सेवा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

दीर्घकालीन टप्पा २०२७ पर्यंत

या प्रकल्पाचा दीर्घकालीन टप्पा २०२७ पर्यंत राबविण्यात येणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित पिकांवरील कीड-रोगांचा अंदाज, प्रत्येक शेतकऱ्यासाठी त्यांच्या शेतीला उपयुक्त अद्ययावत सल्ला, वित्त विषयक आणि विमाविषयक सेवांचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे.

‘पोकरा’च्या संचालकांवर जबाबदारी

खरीप हंगामातील एआयच्या अंमलबजावणीची जबाबदारी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या संचालकांवर राहणार आहे. या प्रकल्पातील माहिती कृषी विभागाच्या प्रधान सचिवांना वेळोवेळी द्यावी लागणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com