
Satara News : सातारा जिल्ह्यात यंदा मे महिन्याच्या अखेरीस आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पेरणीसाठी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र पाऊस सलग सुरु राहिल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. सलग पावसामुळे मशागतीही झाल्या आहेत.
त्यामुळे पेरणीचा विषय लांबच राहिला. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सातारा जिल्ह्यात केवळ चार टक्केच पेरणी झाली होती. त्यानंतरही पावसाने उघडीप न दिल्याने पेरण्यांची गती मंदावली आहे. दरवर्षी जून महिन्यात खरीपाच्या पेरण्या उरकलेल्या असतात. यंदा मात्र जून महिना संपत आला तरीही उसाचे क्षेत्र वगळता केवळ २३ टक्केच पेरण्या झाल्या असून त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडणार असल्याचे दिसत आहे.
सातारा जिल्ह्यातील शेतकरी ऊस, भात, सोयाबीन, भुईमुगसह बाजरी, मका, ज्वारी, मुग, नाचणी, तूर, उडीद व अन्य कडधान्यांची पिके मोठ्या प्रमाणावर घेतात. त्याचबरोबर उसाचीही लागण मोठ्या प्रमाणात करत असतात. खरिपातील पेरणीसाठी दरवर्षी शेतकरी १५ मे नंतर मशागतीच्या मागे लागत असतात.
मशागती झाल्यानंतर दरवर्षी खरिपातील पेरणीसाठी दरवर्षी शेतकरी पावसाची चातक पक्षाप्रमाणे वाट पहात असतात. यंदा मात्र त्याउलट स्थिती मे महिन्याच्या मध्यावरच झाली. गेल्या दीड महिन्यांपासून सातारा जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरुच आहे. त्यामुळे शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले.
त्यामुळे सातारा जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर मशागती प्रलंबीत राहिल्या होत्या. त्यानंतर काही दिवस पावसाने उघडीप दिल्याने त्यादरम्यान शेतकऱ्यांनी पेरण्या उरकून घेतल्या. त्याही जेमतेम चार टक्केच पेरण्या झाल्या. त्यानंतरही पावसाची बरसात सुरुच राहिली. त्यामुळे जेथे-जेथे उघडीप मिळेल तेथील शेतकऱ्यांनी पेरण्या उरकण्याची लगबग सुरु केली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.