Sugarcane Bills : शेतकऱ्यांच्या हातात पैसाच नाही, पांटबंधारे विभागाची वसुलीसाठी कसरत

Irrigation Department : पाटबंधारे विभाग मागच्या काही दिवसांपासून वसुली करत आहे परंतु वसुलीचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण होऊ शकले नाही.
Sugarcane Bills
Sugarcane Billsagrowon

Irrigation Department Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस गळीत हंगाम संपूण जवळपास २ महिने होत आले तरी काही साखर कारखान्यांची बिले जमा झाली नाही. दरम्यान यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे बजेट कोलमडल्याचे चित्र पहायला मिळत आहे. बिलेच जमा झाली नसल्याने शेती मशागतीच्या कामांसह पाणीपट्टी भरण्यासाठी पैसेच नसल्याची माहिती शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान पाटबंधारे विभाग मागच्या काही दिवसांपासून वसुली करत आहे परंतु वसुलीचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण होऊ शकले नाही. वसुली फक्त एक कोटी ४२ लाख ७५ हजार रुपये इतकी झाली असून, ती ६१.७३ टक्के इतकी आहे.

सरकारकडून २०२३-२४ या आर्थिक वर्षात कोल्हापूर उत्तर पाटबंधारे विभागाला सिंचनचे १४ कोटी ५० लाख रुपयांचे व बिगर सिंचनचे ३२ कोटी रुपये तर कोल्हापूर दक्षिण पाटबंधारे विभागाला सिंचनचे चार कोटी ५० लाख रुपये व बिगर सिंचनचे तीन कोटी रुपये उद्दीष्ट देण्यात आले होते. त्यातील कोल्हापूर उत्तर पाटबंधारे विभागाने सिंचनचे ७ कोटी ६९ लाख २२ हजार रुपये व बिगर सिंचनचे ४६ कोटी ३२ लाख ९ हजार रुपये तर कोल्हापूर दक्षिण पाटबंधारे विभागाने सिंचनचे ४ कोटी ३ लाख ६५ हजार रुपये व बिगर सिंचनचे ३ कोटी ७० लाख ६५ हजार रुपये वसुल केले आहेत.

वसुलीची रक्कम कर्मचाऱ्यांकडून प्रत्यक्ष भेटी देऊन गोळा करण्यात आली. त्याचबरोबर ऑनलाईनद्वारे व पाटबंधारे विभागाच्या शाखांमध्ये ही वसुलीची रक्कम भरुन घेतली. बिगर सिंचनचे दोन्ही विभागाचे उदिष्ट तब्बल १४२.९६ टक्के पूर्ण झाले आहे. यामध्ये ५० कोटी ३ लाख ६ हजार रुपये वसुल झाले आहेत. तर दोन्ही विभागांची सिंचन विभागाचे उद्दीष्ट फक्त ६१.७३ टक्के इतकेच पूर्ण झाले आहे. यामध्ये सिंचनचे उद्दीष्ट १९ कोटी इतके असून त्यातील फक्त ११ कोटी ७२ लाख ९ हजार रुपये इतकेच वसुल झाले आहेत.

हे उद्दीष्ट पूर्ण न होण्याचे प्रमुख कारण म्हणजे साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना अद्याप ऊसाची न दिलेली बिले आहेत. आमच्याकडे पैसेच नाही तर बिले कुठून देणार अशी उत्तरे शेतकऱ्यांकडून वसुलीला गेलेल्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली. त्याचबरोबर पाणीपट्टीच्या दरवाढीमुळे ही काही शेतकऱ्यांनी पाणी पट्टीची बिले भरलेली नसल्याचे चित्र आहे.

Sugarcane Bills
Drip Irrigation : ठिबक सिंचनासाठी ‘जीएसआय’ प्रणालीचा वापर

कार्यक्षेत्र असे

पाटबंधारे उत्तर विभागाचे कार्यक्षेत्र भुदरगड, गडहिंग्लज, चंदगड, आजरा हे आहे, तर दक्षिण विभागात करवीर, राधानगरी, कागल, हातकणंगले, शिरोळ, शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा हे तालुके येतात. याचे ग्राहक हे औद्योगिक असून यामध्ये महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती, साखर कारखाने, ‘एमआयडीसी’तील मिल व कारखाने आदींचा समावेश आहे. तसेच दक्षिण विभागाचे कार्यक्षेत्र हे भुदरगड, गडहिंग्लज, आजरा, चंदगड या तालुक्यांचे आहे. याचे ग्राहक हे शेतकरी व ग्रामीण पाणीपुरवठा संस्था आहेत.

यावर पाटबंधारे उत्तर विभागाच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने म्हणाल्या की, साखर कारखान्याची बिले वेळेत न मिळाल्यामुळे व पाणीपट्टीच्या दरवाढीमुळे सिंचनची पाणी पट्टी भरली नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे सिंचनची वसुलीचे शंभर टक्के उद्दीष्ट पूर्ण होऊ शकलेले नाही. जर कारखान्यांनी वेळेत बिले शेतकऱ्यांना दिली असती तर आणखी वसुलीची टक्केवारी वाढली असती. सिंचनची पाणीपट्टी वेळेत भरली तर ग्राहकांना विलंब शुल्क आकारले जात नाही.

परंतु अनेक ग्राहक हे वेळेत पैसे भरत नसल्याने थकबाकी वाढली आहे. पाणीपट्टीची रक्कम ही एका हेक्टरसाठी १३५० रुपये इतकी अल्प आहे, तरीही ग्राहकांकडून ती भरली जात नाही. यामुळे पाटबंधारे विभागाच्या महसुलावर परिणाम होत आहे, तरी थकबाकीदारांनी पाणीपट्टी भरून सहकार्य करावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com