Coconut Farming : नारळ बागेत तण, खत व्यवस्थापनावर भर

Coconut Farming Management : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाधवडे (ता. वैभववाडी) येथे रमेश श्रीपत चव्हाण यांची २३ एकर शेतजमीन आहे. त्यापैकी साडेपाच एकर क्षेत्रावर नारळ लागवड आहेत.
Coconut Farming
Coconut Farming Agrowon
Published on
Updated on

Farmer Management :

शेतकरी नियोजन

पीक : नारळ

शेतकरी : रमेश श्रीपत चव्हाण

गाव : नाधवडे, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग

एकूण शेती : २३ एकर

नारळ झाडे : ३००

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाधवडे (ता. वैभववाडी) येथे रमेश श्रीपत चव्हाण यांची २३ एकर शेतजमीन आहे. त्यापैकी साडेपाच एकर क्षेत्रावर नारळ लागवड आहेत. त्यात ३०० नारळ लागवड केली आहे. ही संपूर्ण लागवड २००२ मध्ये करण्यात आली आहे. यामध्ये बाणवली आणि टीडी या नारळ जातींचा समावेश आहे. नारळ बागेमध्येच जायफळ, दालचिनी आदी मसाला पिकांसह सुपारी लागवड आहे. याशिवाय वेगळ्या प्लाटमध्ये आवळा लागवड केली आहे. आगामी काळात पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर नारळ बागेत रासायनिक खतांची दुसरी मात्रा देण्याचे नियोजित आहे, असे रमेश चव्हाण सांगतात.

Coconut Farming
Coconut Farming : नारळ उत्पादकांसाठी एकदिवसीय कार्यशाळा

मागील कामकाज

जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू झाला. या दरम्यान सेंद्रिय खत, रासायनिक खत आणि शेणखत मात्रा देण्यात आली.

झाडांभोवती चर काढून घेतले आणि त्यामध्ये सर्व खतमात्रा देण्यात आली. खतमात्रेचे नियोजन हे दापोली कृषी विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे करण्यात आले. खतमात्रा दिल्यानंतर चर बुजवून घेतले.

पावसाळ्यात अतिरिक्त पाणी बागेत साचू नये यासाठी काळजी घेण्यात आली.

या वर्षी जुलै महिन्यात अत्यंत जास्त झाला होता. त्यामुळे बागेत कोणतीही कामे करणे शक्य झाले नाही. त्यामुळे फक्त झाडावरून पडलेले नारळ जमा करण्याव्यतिरिक्त अन्य काम केली नाहीत.

पावसामुळे बागेत तणांचा प्रादुर्भाव वाढला होता. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बागेतील तण काढून घेतले. तण नियंणत्रासाठी बागेत तणनाशकाचा वापर केला जात नाही.

Coconut Farming
Coconut Farming : देवरे कुटुंबीयांनी निवडली उत्पन्नवाढीसाठी नारळ शेती

आगामी नियोजन

अद्यापही अधूनमधून जोरदार पाऊस होतो आहे. पाऊस कमी झाल्यानंतर नारळ झाडांना रासायनिक खतांचा दुसरा डोस दिला जाईल. त्यानुसार खतांची जुळवाजुळव केली आहे. या डोसमध्ये सेंद्रिय खतांचे प्रमाण अधिक ठेवले आहे.

नोव्हेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण कमी होते. या कालावधीत झाडावर चढून नारळ काढण्याचे काम केले जाईल. तसेच नारळाच्या सुकलेल्या फांद्या, शेंड्याच्या भागाची साफसफाई करून कीटकनाशक फवारणी केली जाईल.

नारळ झाडावर सोंड्या भुंगा आणि गेंडा भुंग्याचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे झाडांची चांगली स्वच्छता करून कीटकनाशक फवारणी करण्यावर भर दिला जातो.

डिसेंबर महिन्यापासून नारळ बागेत सिंचनाचे काटेकोर नियोजन करण्यास सुरवात केली जाईल. नारळ बागेत पाटपाणी देण्यावर भर दिला जातो. डिसेंबरमध्ये थंडीचे प्रमाण चांगलेच असते. त्यामुळे या काळात चार ते पाच दिवसांनी सिंचन केले जाते. त्यानंतर तापमान वाढत जाईल तसे पाण्याच्या दोन पाळ्यांमधील अंतर कमी केले जाते. प्रत्येक झाडाला साधारणपणे अडीचशे ते तीनशे लिटर पाणी मिळेल असे नियोजन असते.

फेब्रुवारी महिन्यापासून तापमान चांगलेच वाढण्यास सुरवात होते. फेब्रुवारीपासून मे अखेरपर्यंत पाण्याचे बाष्पीभवन होण्याचे प्रमाण खूप जास्त असते. बाष्पीभवन रोखण्यासाठी झाडांच्या बुंध्यात पालापाचोळा रचून आच्छादन केले जाते. तसेच पाण्याच्या पाळ्यांमध्ये वाढ केली जाते. एप्रिल मे या दरम्यान एक दिवसाआड पाणी दिले जाते.

रमेश चव्हाण, ९४२३५१३८५३

(शब्दांकन : एकनाथ पवार)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com