
Manchar News: नागरिकांचे आरोग्य टिकवणे, पर्यावरणपूरक शेतीला चालना देणे व पारंपरिक देशी वाणांचे संवर्धन करणे या उद्देशाने ‘ज्ञानशक्ती विकास वाहिनी’ संस्थेने पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र जीन बँक प्रकल्पांतर्गत या उपक्रमाची सुरुवात आंबेगाव तालुक्यात करण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात ५० शेतकऱ्यांना देशी भाजीपाला व कडधान्यांच्या मोफत बियाण्यांचे वाटप सुरू करण्यात आले आहे.
बीजमाता पद्मश्री राहिबाई पोपेरे यांच्याकडून उपलब्ध झालेले हे बियाणे शाश्वत शेतीच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. याबाबत माहिती देताना ज्ञानशक्ती संस्थेचे प्रकल्प अधिकारी प्रा. सलमान शेख म्हणाले, ‘‘सध्या अधिक उत्पादनासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर करीत आहेत.
यामुळे माणसांच्या आरोग्यावर तसेच जमिनीच्या सुपीकतेवर गंभीर परिणाम होत आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबासाठी तरी दहा गुंठे क्षेत्रात रासायनिक मुक्त देशी वाणांची शेती करावी. याबाबत संस्थेमार्फत गावोगावी जनजागृती सुरू आहे.’’
या उपक्रमांतर्गत सोमवारी (ता.२) नारायण तुळशीराम टाव्हरे (निरगुडसर), किसन नाथा लोंढे (एकलहरे), दिनेश शंकर भोर (शिंदेवाडी) व भाऊसाहेब कोंडाजी शिंदे (कारेगाव) या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात बियाण्यांचे वाटप करण्यात आले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.