NCP Crisis : शरद पवार गटाकडून ४० आमदारांच्या विरोधात अपात्रतेची याचिका
NCP Crisis Updates : शिवसेनेच्या बंडानंतर एक वर्षानंतर अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत बंड झाले. दीड वर्षानंतर शिवसेनेनंतर राष्ट्रवादीतही पक्ष, निवडणूक चिन्हासाठी संघर्ष सुरू झाला असून आता शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे उत्तर दाखल केले आहे. त्यांच्याकडून अजित पवार गटातील ४० आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची याचिका दाखल करण्यात आली आहे.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत बंड झाल्याने पक्षात दोन गट पडले. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ९ जणांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. तर शरद पवार गटाने महाविकास आघाडीसोबत राहण्यावर निर्णय घेतला. बंडखोर आमदारांच्या गटाने पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून शरद पवार यांना हटवून अजित पवार यांची, तर प्रदेशाध्यक्षपदावरून जयंत पाटील यांच्या जागी सुनील तटकरे यांची निवड केली आहे. दोन्ही गटांकडून पक्ष आणि चिन्हावर दावा करण्यात येत आहे. तसेच या दोन्ही गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती.
निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला आपले म्हणणे मांडण्याचे नोटीस दिले होते. त्यानुसार आज शरद पवार यांच्या गटाकडून उत्तर देण्यात आले आहे. त्यामध्ये ९ मंत्री आणि ३१ आमदारांनी पक्ष विरोधी कारवाई केल्याने त्यांच्या अपात्रतेची कारवाई करण्याची याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये ४ विधानपरिषदेच्या आमदारांचाही समावेश आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या गटानेही आपले उत्तर दाखले केल्याची माहिती आहे.
दीड वर्षांपूर्वी शिवसेना पक्षाच्याबाबत निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात संघर्ष पाहायला मिळाला होता. तशाच प्रकारचा संघर्ष राष्ट्रवादीमध्ये पुन्हा पाहायला मिळत आहे. त्यामुळे दोन्ही गटाकडून आलेल्या उत्तरानंतर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.