Delhi Farmer Protest : चर्चा सकारात्मक; तोडगा नाहीच

Farmer Demand Update : आंदोलक शेतकरी आणि केंद्रीय मंत्र्यांच्या शिष्टमंडळामध्ये गुरुवारी (ता. १५) झालेली चर्चेची तिसरी फेरी सकारात्मक झाली असली, तरीही या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही समाधानकारक तोडगा निघाला नाही.
Delhi Farmer Protest
Delhi Farmer ProtestAgrowon

Delhi News : आंदोलक शेतकरी आणि केंद्रीय मंत्र्यांच्या शिष्टमंडळामध्ये गुरुवारी (ता. १५) झालेली चर्चेची तिसरी फेरी सकारात्मक झाली असली, तरीही या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही समाधानकारक तोडगा निघाला नाही. त्यामुळे शेतकरी आंदोलक शुक्रवारीही पंजाब आणि हरियानाच्या सीमेवर ठाण मांडून बसले होते.

गुरुवारी रात्री पावणेनऊ वाजता तीन केंद्रीय मंत्र्यांचे शिष्टमंडळ आणि आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ यांच्या दरम्यान सुमारे पाच तास बैठक झाली. मात्र या चर्चेतून कोणताही समाधानकारक तोडगा निघाला नाही. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री अर्जुन मुंडा, उद्योगमंत्री पीयूष गोयल आणि केंद्रीय गृहराज्य मंत्री नित्यानंद राय हे सरकारच्या शिष्टमंडळात सहभागी होते.

Delhi Farmer Protest
Delhi Farmers Protest : आंदोलक शेतकऱ्यांवर पोलिसांचा बळाचा वापर ; अश्रू धुराच्या नळकांड्याही फोडल्या

त्याचप्रमाणे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि अर्थमंत्री हरपाल सिंग चिमा तसेच संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चाचे प्रतिनिधी बैठकीत सहभागी झाले होते. यापूर्वी आठ आणि १२ फेब्रुवारीलाही या दोघांत झालेल्या चर्चा निष्फळ ठरल्या होत्या. आता रविवारी (ता. १८) आंदोलक शेतकऱ्यांचे आणि केंद्रीय मंत्र्यांचे शिष्टमंडळ यांच्यामध्ये चर्चेची चौथी फेरी होणार आहे.

माध्यमांशी बोलताना केंद्रीय अर्जुन मुंडा म्हणाले, की सरकार आणि आंदोलकांत सकारात्मक चर्चा झाली. आम्ही एकत्र बसून चर्चा करत आहोत आणि लवकरच शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढू. या वेळी पंजाबमधील संगरूर, पतियाला आणि फतेहगड साहेब येथील इंटरनेट सेवा स्थगित असल्याबद्दल पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याकडून केंद्राकडे नाराजी व्यक्त केली.

तसेच शंभू आणि खानुरी सीमेवर निमलष्करी दलाच्या जवानांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याबद्दल केंद्राकडे तक्रार करण्यात आली. शेतकरी नेते सरवनसिंग पंधेर यांनी सांगितले, की सरकारशी विस्तृत चर्चा झाली. त्यांनी आमच्याकडे अजून थोडा वेळ मागितला आहे. आम्हाला संघर्ष नको आहे, आमची इच्छा आहे की या चर्चांतून सकारात्मक मार्ग निघावा अन्यथा ‘दिल्ली चलो’ आंदोलनाचा पर्याय निवडावा लागेल.

Delhi Farmer Protest
Europe Farmers Protest : आंदोलक शेतकऱ्यांचा ट्रॅक्टरसह रोममध्ये प्रवेश

माध्यमांशी बोलताना केंद्रीय अर्जुन मुंडा म्हणाले, की सरकार आणि आंदोलकांत सकारात्मक चर्चा झाली. आम्ही एकत्र बसून चर्चा करत आहोत आणि लवकरच शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढू. या वेळी पंजाबमधील संगरूर, पतियाला आणि फतेहगड साहेब येथील इंटरनेट सेवा स्थगित असल्याबद्दल पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याकडून केंद्राकडे नाराजी व्यक्त केली.

तसेच शंभू आणि खानुरी सीमेवर निमलष्करी दलाच्या जवानांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याबद्दल केंद्राकडे तक्रार करण्यात आली. शेतकरी नेते सरवनसिंग पंधेर यांनी सांगितले, की सरकारशी विस्तृत चर्चा झाली. त्यांनी आमच्याकडे अजून थोडा वेळ मागितला आहे. आम्हाला संघर्ष नको आहे, आमची इच्छा आहे की या चर्चांतून सकारात्मक मार्ग निघावा अन्यथा ‘दिल्ली चलो’ आंदोलनाचा पर्याय निवडावा लागेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com