
Wardha News : महात्मा गांधी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वर्धा जिल्ह्याची देशभरात वेगळी ओळख आहे. ही ओळख कायम ठेवत याच जिल्ह्यातील देवळी तालुका हा आता फळपीक लागवडीच्या माध्यमातून फळपिकांचे हब म्हणून नावारूपास येत आहे. त्या अंतर्गत देवळी तालुक्यातील गौळ या गावात बारा शेतकऱ्यांच्या माध्यमातून १६ एकरावर पेरू लागवड करण्यात आली.
महात्मा गांधी, विनोबा भावे यांनी आपल्या आयुष्यातील काही काळ वर्धा जिल्ह्यात घालविला. या दोन्ही महापुरुषांमुळेच जिल्ह्यात ग्रामोद्योगाला चालना मिळाली. पशुपालनाच्या माध्यमातून धवलक्रांतीही अनेक गावांत घडली. आता देवळी तालुका हा फळपिकाच्या माध्यमातून पुढे येत आहे.
देवळीचे प्रभारी तालुका कृषी अधिकारी नीलेश उगवेकर यांचे प्रोत्साहन त्यामागे मोलाचे ठरले. उगवेकर यांनी पारंपरिक पिकांच्या तुलनेत आंबा, पेरू, नारळ, लिंबू ही पिके कशी फायदेशीर ठरतात त्याबरोबरच या पिकातील संधी याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती केली. त्याच्याच परिणामी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून पेरू लागवडीसाठी शेतकरी पुढे आले.
गौळ गावात १२ शेतकऱ्यांच्या माध्यमातून १६ एकरावर पेरू लागवड केली जाणार आहे. तीन बाय दोन मीटर या अंतरानुसार सघन पद्धतीने पेरू लागवड होईल. या लागवडीचा प्रारंभ योगेश नागपुरे यांच्या शेतावर करण्यात आला. या वेळी पाणी फाउंडेशनचे जिल्हा प्रतिनिधी भूषण कडू, युवा शेतकरी संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष किरण ठाकरे, कृषी सहायक संतोष बुधवंत, सुभाष राठोड, अनिल माळवे, हनुमंत अंकुश उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.