
१) दत्तात्रय भरणे यांनी कृषिमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला, शेतकरी कल्याणासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं.
२) “मी शेतकरीपुत्र असल्याने शेतकऱ्यांच्या समस्या मला ठाऊक आहेत”, असं त्यांनी स्पष्ट केलं.
३) मुख्यमंत्र्यांनी राज्यभर फिरून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याच्या सूचना दिल्या.
४) सहकाऱ्यांपासून प्रसारमाध्यमांपर्यंत सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचं भरणेंनी नमूद केलं.
५) शेतकऱ्यांच्या हितासाठी त्वरित आणि योग्य निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं.
Mumbai News: मी स्वतः शेतकरीपुत्र असल्याने शेतकऱ्यांच्या समस्या आणि अडचणी मला माहिती आहेत. त्यांच्या कल्याणासाठी आणि हिताचे निर्णय घेण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांना राज्यभर फिरून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्याची आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याची सूचना केल्या आहेत. या कामात सर्वांचे सहकार्य हवे आहे,असे राज्याचे नवे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले.
दत्तात्रय भरणे यांनी आज नवे कृषिमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर, “माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, मी स्वतः शेतकरीपुत्र आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांच्या अडचणी मला माहिती असल्यामुळे निश्चित प्रकारे भविष्यकाळामध्ये माझ्या या जबाबदारीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत कशी करता येईल, त्यांच्या हिताचे निर्णय कसे घेता येतील, यासाठी मी कटिबद्ध आहे. यासाठी मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी सातत्याने चर्चा करून योग्य पावले उचलणार आहे."
पुढे बोलताना त्यांनी सहकार्याचे आवाहन केले. "मी कृषिमंत्री असलो तरी या कामात मला सर्वांचे सहकार्य हवे आहे. माझ्या सहकाऱ्यांना, प्रशासकीय अधिकाऱ्यांना आणि प्रसारमाध्यमांना मी विनंती करतो की, आपणही मला या कामी सहकार्य कराव.. तुमच्या सूचना आणि अनुभवाचा उपयोग शेतकऱ्यांचे भविष्य घडवण्यासाठी नक्कीच होईल," असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेचा उल्लेख करताना भरणे म्हणाले, "कालच मुख्यमंत्र्यांनी मला सांगितले की, राज्यातील प्रत्येक भागात जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या समजून घ्या. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ती पावले उचला. यासाठी राज्याचा प्रमुख म्हणून मी तुम्हाला पूर्ण सहकार्य करेन, असे आश्वासन त्यांनी मला दिले आहे."
शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी भरणे यांनी आपली वचनबद्धता दर्शवली आहे. त्यांच्या या नव्या जबाबदारीकडे शेतकरी आणि सामान्य जनतेचे लक्ष लागले आहे.
१) दत्तात्रय भरणे कोण आहेत?
ते इंदापूरचे आमदार आणि महाराष्ट्राचे नवे कृषिमंत्री आहेत.
२) भरणे यांनी काय आश्वासन दिलं?
शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं.
३) मुख्यमंत्र्यांनी भरणेंना काय सांगितलं?
राज्यभर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेऊन उपाययोजना करण्यास सांगितलं.
४) भरणे यांनी कोणत्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली?
प्रशासकीय अधिकारी, सहकारी आणि प्रसारमाध्यमांचे सहकार्य मागितले.
५) शेतकरी भरणेंकडून काय अपेक्षा ठेवत आहेत?
त्वरित निर्णय, मदत आणि शेतकरी हिताच्या योजनांची अंमलबजावणी.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.