
Pune News: खरिप २०२४ मधील विमा भरपाई राज्यातील काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र खानदेशातील जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यांमध्ये केवळ ३७ कोटी रुपयांची विमा भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे. तसेच कोकणातही केवळ तीन जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना केवळ ९ कोटी रुपये मिळणार आहेत.
राज्यात खरिप हंगाम २०२४ मधील पीक नुकसान भरपाईपोटी २२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २ हजार ३०८ कोटी रुपये वाटप करण्यात येणार आहेत. यात मराठवाड्यातील जिल्ह्यांना सर्वाधिक नुकसान भरपाई मिळणार आहे. मराठवाड्यातील ७ जिल्ह्यांना १ हजार ७६० कोटी विमा भरपाई मिळणार आहे. तर विदर्भातील ९ जिल्ह्यांना ४८९ कोटी रुपयांची भरपाई मिळणार आहे. या तुलनेत मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांना कमी भरपाई मिळणार आहे. खानदेशातील जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खूपच कमी भरपाई मंजूर झाली.
धुळे
स्थानिक नैसर्गिक आपत्ती - २९ कोटी १ लाख
नंदूरबार
स्थानिक नैसर्गिक आपत्ती - ५ कोटी ५ लाख
पीक कापणी प्रयोग - ३ कोटी १३ लाख
एकूण भरपाई - ८ कोटी १९ लाख
जळगाव
पीक कापणी प्रयोग - ९ लाख
कोकणातील शेतकऱ्यांनाही विमा भरपाई यंदा कमीच मिळणार आहे. कोकणातील केवळ तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई यंदा मंजूर झाली. विभागनिहाय विचार करता सर्वात कमी विमा भरपाई कोकणात मिळणार आहे. विशेष म्हणजे कोकणातील ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या तीनही जिल्ह्यांमध्ये केवळ काढणी पश्चात नुकसान या ट्रिगरमधून भरपाई मिळणार आहे.
ठाणे
काढणी पश्चात नुकसान - ७ कोटी १ लाख
रत्नागिरी
काढणी पश्चात नुकसान - ६८ लाख
सिंधुदूर्ग
काढणी पश्चात नुकसान - १ कोटी ५७ लाख
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.