
Bhuvneshwar News: महाराष्ट्रातल्याप्रमाणेच बिहारमध्ये मतांची चोरी करण्याचा डाव आखला जात असून याकामात निवडणूक आयोगाचे सहकार्य लाभत आहे. भाजपकडून महाराष्ट्रातल्याप्रमाणेच बिहारची विधानसभा निवडणूक ‘हायजॅक’ करण्याचा डाव आहे, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केला.
ओडिशात भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर प्रथमच विरोधी पक्ष नेते राहुल गांधी भुवनेश्वरमध्ये शुक्रवारी दाखल झाले. या वेळी त्यांनी भुवनेश्वरमध्ये संविधान बचाव समावेश’ सभेला मार्गदर्शन केले.
यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल उपस्थित होते. यावेळी गांधी म्हणाले, की महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभेदरम्यान मतदारांच्या संख्येत एक कोटींनी भर पडली. एवढी संख्या कोठून आली, याचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. यासंदर्भात मतदार यादी आणि व्हिडिओग्राफीची निवडणूक आयोगाकडे अनेकदा मागणी केली.
परंतु त्यांनी दिली नाही. बिहारच्या निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडी असे प्रकार खपवून घेणार नाही. भाजपकडून निवडणूक ‘हायजॅक’ करण्याचा प्रयत्न करत आहे. पण आम्ही निवडणूक आयोगाला आणि भाजपला मतांची चोरी करू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
ओडिशातील भाजपचे सरकार अदानी चालवते. जगन्नाथ यात्रा निघते तेव्हा नागरिक दर्शनासाठी वाट पाहतात. मात्र अदानी आणि कुटुंबीयांसाठी रथ थांबविला जातो. हे ओडिशाचे सरकार नसून ते अदानी यांच्यासारख्या पाच ते सहा अब्जाधिशांचे सरकार आहे, अशा शब्दात त्यांनी भाजपवर टीका केली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.