Rahul Gandhi farm loan waiver: महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांच्या मुद्द्यावरून लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी (ता. ३) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तीव्र शब्दांत टीका केली. मागील तीन महिन्यांत राज्यात ७६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दाखला देत राहुल गांधी यांनी एक्सवर ट्विट करत केंद्र सरकारच्या कृषी धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राहुल गांधी म्हणाले, "शेतकरी दिवसागणिक कर्जाच्या ओझ्याखाली दबले जात आहेत आणि संपूर्ण व्यवस्था त्यांना शांतपणे संपवत आहे. दुसरीकडे, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र आपल्या जनसंपर्काच्या तमाशामध्ये व्यस्त आहेत," अशी टीका त्यांनी केली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.