Banana Crop Damage : खानदेशात वादळी पावसात केळी बागा भुईसपाट

Khandesh rain Update : खानदेशात पाऊस व पीकहानी सुरूच आहे. वादळी पावसाने यावल तालुक्यात तापीकाठच्या गावांत मोठी हानी झाली असून, केळी भुईसपाट झाली आहे.
Banana Crop Damage
Banana Crop Damage Agrowon

Jalgaon News : खानदेशात पाऊस व पीकहानी सुरूच आहे. वादळी पावसाने यावल तालुक्यात तापीकाठच्या गावांत मोठी हानी झाली असून, केळी भुईसपाट झाली आहे. सुमारे १२०० हेक्टरवरील पिकांना या वादळी पावसाचा फटका बसला आहे. त्यात यावल तालुक्यातील मनवेल, पिळोदा, थोरगव्हाण भागांत केळीची मोठी हानी झाली आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे.

यावल तालुक्यात मृग बहर केळीचे अधिकचे नुकसान झाले आहे. काही भागांत वाऱ्याचा वेग अधिक आहे. त्यामुळे हानी ८० टक्क्यांवर झाली आहे. तर काही भागांतील नुकसान ६० ते ७० टक्के आहे. याबाबत कृषी विभागाने पंचनामे सुरू केले आहेत. तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे.

Banana Crop Damage
Hailstorm Crop Damage : गारपिटीने पिंपळगावलेंडी शिवारातील द्राक्ष बाग उद्ध्वस्त

नुकसानीची पातळी अधिक असल्याने हाती काहीच येणार नाही. नुकसानग्रस्त झाडे काढून ती शेताबाहेर फेकावी लागतील. ही कार्यवाही करताना शेतकऱ्यांना मजुरी खर्चही येईल. यावलसह चोपडा, जळगाव भागांतही मागील दोन दिवसांत झालेल्या पावसाने पिकांची हानी झाली आहे.

अधिकारी पाहणीसाठी कधी पोहोचणार?

यावल तालुक्याला सर्वाधिक फटका बसला आहे. या भागास कृषी विभाग व जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन शेतकऱ्यांना दिलासा देणे आवश्यक होते. परंतु नुकसानग्रस्त भागात वरिष्ठ अधिकारी पोहोचलेले नसल्याची माहिती मिळाली.

Banana Crop Damage
Paddy Crop Damage : भोर तालुक्यात पावसात नाचणी, वरईचे नुकसान

नुकसान वाढतेच

खानदेशात वादळी पावसाचा धुमाकूळ मागील सात ते आठ दिवसांपासून सुरूच आहे. थंडी गायब झाली आहे. निरभ्र, कोरड्या वातावरणाअभावी पीक लागवड व इतर कार्यवाही करणे अशक्य झाले आहे. शेतीकामे ठप्प आहेत. अशातच नुकसानीची पातळी, क्षेत्र यात वाढ होतच आहे. खानदेशात सुमारे २५ हजार हेक्टरवरील पिकांचे अंशतः नुकसान झाले आहे.

परंतु शासकीय अहवालानुसार हे नुकसान फक्त दोन हजार हेक्टर एवढेच दिसत आहे. नुकसानीचे पंचनामे करताना कापसाला वगळले आहे. यामुळे हे नुकसान कमी दिसत आहे. या स्थितीत कोरडवाहू कापसासंबंधीदेखील पंचनामे करावेत, २० ते ३० टक्के नुकसान झालेले असल्यासही पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कारण खानदेशात सुमारे सात लाख हेक्टरवर अद्याप कापूस पीक उभे आहे. त्याचे रोजच्या पावसात नुकसान होतच आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com