
Jalgaon News : कमाल विमा प्रस्ताव मंजूर नसल्याने हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत २०२४-२५ मध्ये केळी पिकासाठी विमा संरक्षण घेतलेल्या विमाधारकांना विमा परतावे किंवा नुकसान भरपाई मिळण्यास विलंब होईल, अशी स्थिती आहे.
२०२४-२५ या हंगामात फळ पीकविमा योजनेतून जिल्ह्यातील सुमारे ७२ हजार केळी उत्पादकांनी केळी पिकासाठी विमा संरक्षण घेतले आहे. १ ते ३१ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत शेतकऱ्यांनी केळी पिकासाठी विमा संरक्षण घेतले. या योजनेतून १ नोव्हेंबर २०२४ ते ३१ जुलै २०२५ या कालावधीसाठी केळी पिकास विमा संरक्षण देण्यात आले.
हा विमा संरक्षण कालावधी संपल्यानंतर ४५दिवसात पात्र केळी विमाधारकांना विमा परतावे किंवा नुकसान भरपाई देय असल्याचा नियम आहे. हा विमा संरक्षण कालावधी आता संपला आहे. परंतु कमाल विमा प्रस्ताव अजून मंजूर (अॅप्रूव्ह) नाहीत. यातच परताव्यांबाबत शासनाकडून हालचाली दिसत नसल्याची स्थिती आहे.
राज्य शासन या योजनेतून केळी पिकासाठी केंद्र सरकारच्या तुलनेत अधिकचा निधी विमा परतावा म्हणून देते. तर १७ हजार रुपये एवढा निधी केंद्र सरकार या योजनेत केळी पिकासाठी विमा परताव्यापोटी देते.
निधी आल्यानंतर २१ दिवसांचा संकेत
राज्य शासनाचा निधी या योजनेसाठी प्राप्त झाल्यानंतर विमा कंपनी २१ दिवसात परतावे पात्र केळी विमाधारकांच्या बँक खात्यात वर्ग करील, असाही संकेत या योजनेत आहे. पण कृषी विभाग, विमा कंपनी या योजनेची कार्यवाही अंतिम करण्यासाठी जेवढा विलंब करील, तेवढाच पुढे अधिकचा कालावधी परताव्यांना लागेल. यामुळे शेतकऱ्यांत नाराजी आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.