Farmer loan Waiver: कर्जमाफीसाठी मुंबई एकदिवस बंद करा; बच्चू कडू यांची राज ठाकरेंकडे मागणी 

Farmers Rights: मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. यापूर्वीही मुंबई अनेक कारणांसाठी बंद झालेली आहे. आता किमान एक दिवस तरी मुंबईने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे.
Bacchu Kadu
Bacchu KaduAgrowon
Published on
Updated on

Mumbai News: मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. यापूर्वीही मुंबई अनेक कारणांसाठी बंद झालेली आहे. आता किमान एक दिवस तरी मुंबईने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे.तसेच शेतकरी हा विषय कोणत्याही एका पक्षाचा किंवा जाती-धर्माचा नाही. “शेतकरी सर्वांचा आहे. त्यामुळे मनसेने यात पुढाकार घेतल्यास शेतकरी आंदोलनाला निश्चितच मोठे बळ मिळेल, अशी अपेक्षा माजी आमदार बच्चू कडू यांनी राज ठाकरेंकडे व्यक्त केली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी मुंबईतील ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीवेळी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बच्चू कडू यांनी मुंबई एक दिवस शेतकऱ्यांसाठी बंद ठेवण्याची मागणी केली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्यांना बळ मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Bacchu Kadu
Bacchu Kadu: शेतकरी आत्महत्याप्रश्‍नी ‘सिंदूर यात्रा’ काढणार : कडू

बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, यवतमाळ येथे आयोजित करण्यात येणाऱ्या शेतकरी यात्रेचे निमंत्रण राज ठाकरे यांना देण्यात आले आहे. “राज ठाकरे यांनी या यात्रेत सहभागी व्हावे आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी आमची इच्छा आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. यापूर्वीही मुंबई अनेक कारणांसाठी बंद झालेली आहे.

Bacchu Kadu
Bacchu Kadu Disqualified: जिल्हा बॅंक अध्यक्षपदावरून बच्चू कडू अपात्र

आता किमान एक दिवस किंवा काही तास तरी मुंबईने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे. यातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना देशभरातून आवाज मिळेल,” असे कडू म्हणाले.या भेटीत शेतकऱ्यांच्या आगामी आंदोलनाची दिशा, धोरणे आणि मागण्यांवरही चर्चा झाली. बच्चू कडू यांनी स्पष्ट केले की, शेतकरी हा विषय कोणत्याही एका पक्षाचा किंवा जाती-धर्माचा नाही. “शेतकरी सर्वांचा आहे.

त्यामुळे मनसेने यात पुढाकार घेतल्यास शेतकरी आंदोलनाला निश्चितच मोठे बळ मिळेल. आमचा उद्देश निवडणुकीशी संबंधित नाही, तर शेतकऱ्यांचे जीवन वाचवणे हा आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.याशिवाय, बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावरही टीका केली. फडणवीस यांनी दुष्काळ पडल्यास कर्जमाफीचा विचार केला जाईल, असे म्हटले होते.

यावर कडू म्हणाले, “आता दुष्काळ पडण्याची वाट पाहायची का? गेल्या काही वर्षांपासून शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, हीच शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी समस्या आहे. मागील दोन वर्षांपासून शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. यामुळे शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. हे फडणवीस यांच्या लक्षात यायला हवे.”

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com