
Mumbai News: कृषी विभागाला जास्तीत जास्त निधी मिळावा यासाठी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरू. तसेच शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कायम प्रयत्नशील असेन, अशी ग्वाही कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंगळवारी (ता. ५) दिली.
कृषिमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. तसेच माणिकराव कोकाटे यांनीही क्रीडा खात्याचा पदभार स्वीकारत कामाला सुरुवात केली.
कृषिमंत्री भरणे म्हणाले, ‘‘मी नुकताच पदभार घेतला आहे. विभागाकडून सर्व माहिती घेतल्यानंतर प्रत्यक्ष कारभाराला सुरुवात करेन. कृषिमंत्री म्हणून काम करताना शेतकरी केंद्रस्थानी ठेवूनच धोरणे आखली जातील. मी स्वत: शेतकऱ्याचा मुलगा असून, शेती व शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय हाच माझा प्राधान्याचा विषय असेल. कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी मी प्रयत्न करणार आहे.’’
‘बेदाणा चोरट्या आयातीबाबत केंद्राकडे पाठपुरावा करू’
देशात बेदाण्याची चोरटी आयात होत असल्याने राज्यातील द्राक्ष उत्पादकांना तोटा होत असल्याची बाब पत्रकारांनी निदर्शनास आणू दिली. चोरट्या आयातीमुळे नुकसान होत आहे हे खरे आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारला पत्र लिहून कळविले आहे. या प्रकरणाची पूर्ण माहिती घेऊन त्याबाबत कडक उपाययोजना करण्यात येतील.
शेतीमालाला भाव हाच प्राधान्यक्रम
शेतीमालाला भाव मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे आणि अन्य विभागांशी समन्वय ठेवून शेतकऱ्यांना साह्य करणे हेच आमच्या विभागाचे प्राधान्य असेल, असेही श्री. भरणे म्हणाले. पदभार घेताना कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.