
Badalapur News: अंबरनाथ तालुक्यातील चिंचवली आणि कोपऱ्याची वाडी ही दोन गावे इको-सेन्सेटिव्ह झोनमध्ये आहेत; मात्र अनेक वर्षांपासून येथे दगडखाण सुरू होती. सरकारचे सगळे नियम धाब्यावर बसवून चालू असणाऱ्या दगडखाणीमुळे भूस्खलन आणि दरड कोसळण्याची भीती आहे.
त्यामुळे येथील गावे व जवळील आदिवासी वस्तीतील गावकरी भयभीत झाले होते. अखेर यासंदर्भात वनशक्तीने दखल घेत आवाज उठवला. त्यावर उच्च न्यायालयाने नुकताच या दगडखाणीच्या मालकाला परवानगीपेक्षा जास्त उत्खनन केल्याने तब्बल १९० कोटींचा दंड ठोठावला आहे. राज्यातील एखाद्या दगडखाणीला सुनावलेला हा सर्वाधिक दंड असल्याचे म्हटले जात आहे.
चिंचवली व कोपऱ्याची वाडी या ठाकूर या आदिवासी समाजाच्या दोन्ही वाड्यांमध्ये एकूण ८५ घरे आहेत. जवळपास ८०० हून अधिक लोकसंख्या या दोन्ही वाड्यांत आहे. त्यांना दगड खाणीचा मोठा त्रास सहन करावा लागत होता, जो आता उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे थांबला आहे.अंबरनाथ तालुक्यातील तासगावजवळील चिंचवली व कोपऱ्याची वाडी या ठाकूर समाजाच्या आदिवासी वस्तीच्या वरच्या डोंगरावर जवळपास २००८ पासून दगडखाण आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.