Washi News : राज्यातील बहुतांश भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून भाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. एमपीएमसीतील आवक कमी झाल्याने घाऊक दर जवळपास ४० टक्क्यांनी वाढले आहेत. अवकाळीचा फटका, त्यात वाहतूक खर्चही निघत नसल्याने एमपीएमसीत भाजीपाला पाठवणे परवडत नसल्याचे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. किरकोळ बाजारातही भाज्यांचे दर दुप्पटीने वाढल्याने गृहिणींचे बजेट पुरते कोलमडले आहे.
नवी मुंबईतील एपीएमसीत दरदिवशी भाजीपाल्याच्या ६०० ते ६५० गाड्या येतात. सोमवारी भाज्यांच्या एकूण ५२२ गाड्यांची आवक झाली. ज्यामध्ये केवळ ३२ मोठ्या वाहनांचा समावेश आहे. भाज्यांचे कमी उत्पादन आणि वाहतूक खर्चही निघत नसल्याने शेतकरी एपीएमसीत भाजीपाला पाठवण्याऐवजी थेट ग्राहकांना विकण्यास प्राधान्य देत आहेत. दोन आठवड्यांपूर्वी १५ ते २० रुपये किलोने मिळणारी वांगी आता २४ ते ३५ रुपये किलोने विकली जात आहे. तर २० ते ४५ रुपये किलोने मिळणारी भेंडी आता ४५ ते ५० रुपयांना मिळत आहे. गवार ६० रुपयांना तर पडवळ ४० ते ५० रुपये किलोने मिळत आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.