Mumbai News : कडाक्याचा उन्हाळा आणि पाणीटंचाईचा फटका रोजच्या जेवणातील भाजीपाल्याला बसला आहे. एपीएमसीत सध्या भाज्यांची आवक घटली असून फरसबीचे दर आठ पटीने वाढलेले आहेत.
घाऊक बाजारात फरसबी १६० ते १८० रुपयांना मिळत असून किरकोळ बाजारात २५० ते २८० रुपये किलो दराने विकली जात आहे. त्याचसोबत मटार, गवार, दोडका, घेवडा यांच्या दरातही वाढ झालेली पाहायला मिळते आहे. काही भाज्यांनी तर शंभरी पार केली आहे.
आठवड्याभरापूर्वी घाऊक बाजारात २० ते २४ रुपयांना विकली जाणारी फरसबी १६० ते १८० रुपये किलोंवर पोहोचली आहे, तर २० ते २४ रुपयांना मिळणारा घेवडा ४० ते ५० रुपये प्रती किलोवर गेला आहे. ३४ ते ४० रुपयांना मिळणारा मटार आता ९० ते १०० रुपये किलोने विकला जात आहे.
कारले आता ३५ ते ४५ रुपयांना मिळत आहे, तर २४ ते ३२ रुपयांना मिळणारा दोडका ४० ते ५० रुपयांना मिळत आहे. अजून काही दिवस बाजार तेजीत राहील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे.
भाज्यांचे दर
भाज्या दर (प्रतिकिलो रुपयांत)
फरसबी २५०
मटार १६०
घेवडा १२०
दोडका १२०
कारले १००
गवार १००
भेंडी ८०
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.