
Jammu News: भारत-पाकिस्तान संघर्षामुळे झालेल्या गोळीबारात आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला असून, सुमारे ६० जण जखमी झाले आहेत. भारत-पाकिस्तान संघर्षामुळे जम्मू, राजौरी आणि सांबा जिल्ह्यांतील हजारो नागरिकांना मदत छावण्यांमध्ये हलवण्याित आले. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी आणि मंत्री सतीश शर्मा यांनी या भागातील मदत केंद्रांना भेट देऊन व्यवस्था पाहिल्या आणि नागरिकांना दिलासा दिला.
‘‘राजौरी-पूंच पट्ट्यातील आठ ते दहा हजार सीमेवरील रहिवाशांचे स्थलांतर करण्यात आले आहे,’’ अशी माहिती मंत्री सतीश शर्मा यांनी दिली. या नागरिकांना अन्न, वैद्यकीय सेवा आणि अन्य सुविधा पुरविल्या जात आहेत.
हा गोळीबार २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ ठिकाणी केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर सुरू झाला. त्यानंतर पाकिस्तानकडून सतत तोफांचा मारा सुरू असून पूंच, मेंढर, मनकोट, नौशेरा, अखनूर, आरएस पुरा, अरनिया, सांबा, कठुआ आणि अन्य भागांत नागरी वस्तींचे मोठे नुकसान झाले आहे.
मुख्यमंत्री अब्दुल्ला यांनी मिश्रीवाला, नागबनी, बिश्नाह आणि थंडी खुही येथील मदत छावण्यांना भेट देत अधिकाऱ्यांना सतर्क आणि तत्पर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
राजस्थानातही सूचना
राजस्थानमधील सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये पाकिस्तानकडून हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहे. बाडमेरमध्ये इशारा देणारे ‘सायरन’ वाजविण्यात आले असून, गस्त वाढवली आहे. बाडमेर आणि जैसलमेरमधील बाजारपेठा बंद करण्यात आल्या असून, पोलिस वाहनांद्वारे जनतेला सतर्कतेचा इशारा दिला जात आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.