
Pune News: भारत आणि पाकिस्तानमध्ये सायंकाळी ५ वाजता युध्दविराम झाला. पाकिस्तानच्या विनंतीनंतर दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या मध्यस्थीला यश आल्याचे म्हटले आहे. भारताने आपल्या अटींवर हा युध्दविराम केला आहे. भारताच्या परराष्ट्र सचिवांनीही पत्रकार परिषद घेऊन युध्दविराम झल्याची घोषणा केली.
पाकिस्तानच्या डिजीएमओ अर्थात डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशनचा भारताच्या डिजीएमओला फोन आला होता. त्यानंतर हा युध्दविराम झाला आहे. अमेरिकेने भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये युध्द थांबविण्यासाठी दीर्घ चर्चा केल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. याबद्दल त्यांनी दोन्ही देशांचे अभिनंदनही केले.
पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनीही ट्वीट करून युध्दविरामाची माहीती दिली. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, भारत आणि पाकिस्तानन युध्दविरोमावर सहमती दर्शविली आहे. पाकिस्तान नेहमीच शांततेसाठी प्रयत्न करत आहे.
भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनीही पत्रकार परिषद घेऊन युध्दविराम झाल्याचे म्हटले आहे. मिस्री म्हणाले की, पाकिस्तानच्या डीजीएमओने भारतीय डीजीएमओंना फोन केला होता. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सायंकाळी ५ वाजल्यापासून युध्दविराम करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दोन्ही देशांनी जमिनीवर, हवेत आणि समुद्रात गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याचा निर्णय घेतला. तसेच १२ मे रोजी दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये चर्चा होणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.