India-Pakistan Tension: भारत-पाकिस्तान तणावाचा शेतीमाल निर्यातीला फटका

Trade Impact: भारत आणि पाकिस्तानमधील वाढलेल्या तणावामुळे भारताच्या शेतीमाल निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. पाकिस्तानमार्गे होणारी निर्यात थांबली आहे, ज्यामुळे भारताला शेतमाल लांब पल्ल्याच्या मार्गाने निर्यात करावा लागणार आहे.
India-Pakistan Water Issue
India-Pakistan Water IssueAgrowon
Published on
Updated on

Pune News: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात वाढलेल्या तणावामुळे भारताच्या शेतीमाल निर्यातीवर परिणाम झाला आहे. पाकिस्तानमार्गे अफगाणिस्तान तसेच आखाती आणि सोवियत संघातील देशांमध्ये होणारी शेतीमालाची निर्यात सध्या ठप्प झाली आहे. आता कापूस, कापड, साखर, कांदा, सोयापेंडसह इतर तेलबिया पेंड, हळदीसह इतर मसाल्याचे पदार्थ, तेलबियांची निर्यात लांब पल्ल्याच्या मार्गाने करावी लागणार आहे. त्यामुळे निर्यातीचा खर्चही वाढेल, असे निर्यातदारांनी सांगितले.

भारताच्या शेतीमालाची निर्यात आखाती देशांना मोठ्या प्रमाणात होत असते. त्यासाठी पाकिस्तानातून रस्तामार्गे शेतीमाल पाठवणे सोयीचे आहे. कारण माल वाहतुकीसाठी कालावधी कमी लागतो आणि खर्चही कमी येतो. भारतातून शेतीमाल पाकिस्तानमार्गे अफगाणिस्तानला पाठवला जातो. अफगाणिस्तामधून एका मार्गाने आखाती देशांना माल पाठवला जातो. यात इराण, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कुवैत, बहारीन आणि जाॅर्डन या देशांचा समावेश आहे. तर दुसऱ्या मार्गाने सोवियत संघातील देशांना मालाचा पुरवठा केला जातो.

India-Pakistan Water Issue
India Pakistan War: महाराष्ट्रात ‘हाय अलर्ट’; महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवली

निर्यातदारांना चिंता

भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या युध्दसदृश्य स्थिती आहे. भारताने पाकिस्तानसोबतचा व्यापारी मार्ग बंद केला आहे. वाघा-अटारी सीमा यापूर्वीच बंद करण्यात आली आहे. भारताला आता पाकिस्तानला वगळून लांब पल्ल्याच्या मार्गाने शेतीमालाची निर्यात करावी लागणार आहे. त्यामुळे निर्यात खर्चिक होणार आहे.

पाकिस्तानसोबतचा व्यापार

भारतातून पाकिस्तानला कापूस, सूत, पशुखाद्य, मसाले, फळे आणि भाजीपाला, चहा, काॅफी, तेलबिया, डेअरी उत्पादनांची निर्यात होते. तर भारत पाकिस्तानमधून फळे, काजू, खजूर, कापूस, मीठ, लोकर आदी मालाची आयात करतो. पण युद्धजन्य परिस्थितीमुळे हा व्यापार ठप्प झाला आहे.

पाकिस्तानमार्गे होणारी निर्यात

भारतातून कापूस, साखर, फळे, भाजीपाला तसेच हळद, जिरा, कांदा, धने, बडीशेप, इलायची, काजू, शेंगदाणा, खोबऱ्यासह इतर मसाल्यांचे पदार्थ पाकिस्तानमार्गे निर्यात होतात. हरभरा, मसूर, राजमासह कडधान्य तसेच सोयाबीन पेंडेसह इतर तेलबिया पेंडेची निर्यात आखाती आणि सोवियत संघातील देशांना होत असते.

India-Pakistan Water Issue
India-Pakistan War: शेतकऱ्यांवर भारत-पाकिस्तान युध्दाचा काय परिणाम होणार ?

बासमती तांदूळ वधारला

भारत आणि पाकिस्तान हे बासमती तांदळाचे प्रमुख उत्पादक देश आहेत. दोन्ही देशांतील सुगंधी बासमतीला जागतिक बाजारात मागणी असते. परंतु सध्या दोन्ही देशातील संबंधात तणाव वाढला आहे. त्यामुळे तांदळाचा पुरवठा कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे जागतिक बाजारातील खरेदीदारांनी भारताकडे मोर्चा वळवला आहे. मध्य पूर्वेतील सौदी अरेबिया, इराण, येमेन आदी देशांनी भारताकडून खरेदी सुरू केली आहे. तसेच अमेरिकन खरेदीदारही टॅरिफ लागू होण्यापूर्वी तांदळाचा साठा उचलण्यासाठी खरेदी करत आहेत. त्यामुळे मागील सहा महिन्यांतील बासमती तांदळाच्या दरातील घसरण थांबली आहे. मागील दोन आठवड्यांत दरात १० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणामुळे दोन्ही देशांमधील व्यापारी मार्ग बंद झालेले आहेत. त्यामुळे आखाती आणि सोव्हिएत संघातील देशांना निर्यात करण्यासाठी भारतीय निर्यातदारांना जास्त खर्च करावा लागणार आहे. काही काळ याचा निर्यातीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
राहुल चौहान, संचालक, आयग्रेन इंडिया, दिल्ली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com