Kharif Crop : पावसाच्या खंडात वाढ, खरीप पिकांना पाण्याचा ताण

Kharif Season 2023 : परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील सर्वच मंडलांत गेल्या १० ते १५ दिवसांपासून पावसाचा खंड पडला आहे. परिणामी, पिकांना पाण्याचा ताण बसला असून वाढ खुंटली आहे.
Kharif Crop
Kharif CropAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील सर्वच मंडलांत गेल्या १० ते १५ दिवसांपासून पावसाचा खंड पडला आहे. परिणामी, पिकांना पाण्याचा ताण बसला असून वाढ खुंटली आहे. हलक्या तसेच कमी ओलावा आलेल्या भारी जमिनीवरील पिके उन्हामध्ये सुकत आहेत. पावसाच्या खंडाचे दिवस वाढत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

परभणी जिल्ह्यात यंदा जून, जुलै महिन्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. ऑगस्ट महिन्यात गुरुवार (ता. १०) पर्यंत सरासरी ७३.५ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असतांना ७.३ मिलिमीटर (९.९ टक्के) पाऊस झाला आहे. जिल्ह्यात १ जूनपासून आजवर ४२८ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना यंदा प्रत्यक्षात २७३.९ मिलिमीटर (६२.५ टक्के) पाऊस झाला.

Kharif Crop
Kharif Crop Loan : सिंधुदुर्गात खरिपासाठी २०२ कोटींचे कर्ज वितरण

हिंगोली जिल्ह्यात जूनमधील पावसाची तूट जुलैमध्ये भरून निघाली; परंतु ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण खूप कमी झाले असून, गुरुवार (ता. १०) पर्यंत सरासरी ७७.८ मिलिमीटर अपेक्षित असताना १२.१ मिलिमीटर (१५.६ टक्के) पाऊस झाला आहे.

१ जूनपासून आजवर ४७७.२ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात ४३१.२ मिलिमीटर (९०.४ टक्के) पाऊस झाला. परभणी जिल्ह्यात सोयाबीनची २ लाख ५८ हजार हेक्टर व कपाशीची १ लाख ८४ हजार हेक्टरवर लागवड धरून एकूण ४ लाख ९० हजार हेक्टर पेरणी झाली आहे.

Kharif Crop
Kharif Crop : शिरूर तालुक्यात पावसाअभावी पिके कोमेजली

हिंगोली जिल्ह्यात २ लाख हेक्टर पेरणी व कपाशीची ३१ हजार ७९४ हेक्टर लागवड धरुन एकूण ३ लाख ३१ हजार ५१७ हेक्टर पेरणी झाली आहे. सुरुवातीला पेरणी झालेले तसेच कमी कालावधीच्या वाणाचे सोयाबीन फुलोरा अवस्थेत आहे.

लवकर लागवड केलेले कपाशीचे पीक पाते, फुले लागण्याच्या अवस्थेत आहे. उशिरा पेरणी केलेली पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. उघडीप दिल्याने आंतरमशागतीच्या कामांनी वेग घेतला आहे. परंतु पावसाचा खंड पडल्याने हलक्या-बरड जमिनीतील ओलावा कमी झाला आहे.

उन्हामुळे पिके सुकत आहेत. धुरे, बाधांवर तसेच त्या जवळील जमिनीवर भेगा पडल्या आहेत. गवत सुकत आहे. ओलाव्याअभावी जिरायती क्षेत्रातील सर्वच पिकांची वाढ खुंटली आहे. सिंचनाची सुविधा असलेले शेतकरी पाणी देत आहेत.

परंतु वीजपुरवठा सुरळीत नाही. परभणी जिल्ह्यातील जिंतूर, गंगाखेड, पालम, हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, औंढा नागनाथ, सेनगाव तालुक्यांतील डोंगराळ भागातील तसेच इतर मंडलांतील हलक्या जमिनीवरील पीक परिस्थिती बिकट आहे.

आमच्या भागात यंदा शीरा तसेच अत्यंत कमी पाऊस झाला. गेल्या आठवड्यापासून उघडिपीमुळे पाण्याचा ताण बसल्याने सोयाबीनसह अन्य पिके सुकत आहेत. वाढ खुंटलेल्या कपाशीला पाणी सुरू केले आहे.
मोतीराम ब्याळे, आडगाव ता. पालम

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com