
Nagpur News : रिक्त पदांच्या परिणामी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठअंतर्गत राज्यातील तीन पदवी महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबविली जाऊ नये, अशी नोटीस भारतीय पशुवैद्यक परिषद (व्हीसीआय) कडून बजावण्यात आली आहे.
विद्यापीठ मुख्यालय असलेल्या नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयाचा देखील यात समावेश असल्याने हे प्रकरण आणखीनच संवेदनशील झाले असून १४ जुलै पर्यंत या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण करण्याचे सांगण्यात आले आहे.
भारतीय पशुवैद्यक परिषदेच्या माध्यमातून देशभरातील पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ व त्याअंतर्गत असलेल्या पदवी व पदव्युत्तर महविद्यालयाचे संनियंत्रण होते. विद्यार्थ्यांना अपेक्षित सोयी सुविधा व पुरेशा प्राध्यापकांच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण मिळावे, असा उद्देश यामागे आहे. परंतु महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत असलेल्या राज्यातील सहा महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची ४५ ते ५० टक्केपेक्षा अधिक पदे रिक्त आहेत.
परिणामी त्याचा शिक्षणावर परिणाम होत असल्याने याविषयी ‘व्हीसीआय’ने गंभीर पावले उचलत यंदाच्या शैक्षणिक सत्राकरीता मान्यता न देण्याचा निर्णय घेतला आहे. ५-६ जून रोजी माफसूअंतर्गत पाच महाविद्यालयांची एकाचवेळी पाहणी करण्यात आली.
त्यावेळी तीन महाविद्यालयांत मान्य पदांपेक्षा कमी पद संख्या आढळून आली. त्यामध्ये परभणी, नागपूर आणि शिरवळ येथील महाविद्यालयांचा समावेश आहे. परिणामी ‘माफसू’ला १४ जुलैपर्यंत पदभरती न झाल्यास यंदा तीनही महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया थांबविण्याचा इशारा व्हीसीआयकडून देण्यात आला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.