वाशीम : संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या (Sanjay Gandhi Niradhar Yojana) लाभार्थ्यांनी उत्पन्नाचा दाखला, हयातीचा दाखला तसेच याकरिता लागणारी मूळ कागदपत्रे सादर केली नसल्याने त्या लाभार्थ्यांचे मानधन (Remuneration) सुरू झालेले नाही.
अशा लाभार्थ्यांनी संजय गांधी योजना विभागात स्वतः कागदपत्रे सादर करावीत. त्यासाठी दलालांची मदत घेऊ नये. यापूर्वी कागदपत्रे सादर केली असल्यास त्यांनी पुन्हा कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही, अशी माहिती मंगरूळपीर तहसीलदार शीतल बंडगर यांनी दिली.
कागदपत्रे सादर करताना लाभार्थ्यांनी चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखल्याची मूळ प्रत व आधार कार्ड, जन्माचा पुरावा, टीसी, अपंगाचे प्रमाणपत्र, मृत्यू दाखला, दुर्धर आजाराचे मूळ प्रमाणपत्र, घटस्फोटित असल्यास न्यायालयीन पुरावा, रहिवासी दाखला, विधवा महिलांकरिता मुलांच्या वयाचे पुरावे आधार कार्ड व जन्माचे दाखले किंवा बोनाफाइड आदी कागदपत्रे संबंधित शाखेमध्ये लाभार्थ्यांनीच सादर करावीत.
इतर व्यक्तींकडे कागदपत्रे देऊ नयेत. दलालामार्फत कागदपत्रे स्वीकारले जाणार नाहीत. ज्या लाभार्थ्यांची मुले नोकरीवर असतील किंवा व्यापार करीत असतील अशा लाभार्थ्यांनी कार्यालयास अवगत करावे. ही माहिती लाभार्थ्यांनी स्वत:हून पुरविली नाही, तर अशा लाभार्थ्यांवर तसेच त्यांच्या मुलांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येईल, असेही बंडगर यांनी सांगितले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.