
औरंगाबाद : औद्योगिक वसाहत (MIDC) जवळ असल्याकारणाने शेतकऱ्यांनी स्वतःचे शेतकरी उत्पादक कंपनीच्या (Farmer Producer Company) माध्यमातून उद्योग व्यवसाय सुरू करावे, असे प्रतिपादन विभागीय कृषी सहसंचालक डॉ. दिनकर जाधव यांनी केले.
कृषी सामाजिक समावेशन सेवा पंधरवडा कार्यक्रम अंतर्गत रविवारी (ता. 2) गांधी जयंतीचे औचित्य साधून सटाणा येथे लोक सहभागातून बांधला वनराई बंधारा बांधण्यात आला. यावेळी खरीप व रब्बी पीक व्यवस्थापनावर अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. जाधव बोलत होते. तालुका कृषी अधिकारी हर्षदा जगताप यांनी सेवा पंधरवडा शेतकऱ्यांसाठी शासनाच्या योजना महाडीबीटी या संदर्भात माहिती दिली. शून्य मशागत शेती एक्स्पर्ट गुलाबराव खंडागळे यांनी शेतीचे तंत्र या संदर्भात मार्गदर्शन केले.
कृषी सहाय्यक रंगनाथ पिसाळ यांनी पीक फवारणी करताना घ्यावयाची काळजी वनराई बंधारा याचे महत्त्व पाणी व्यवस्थापन या संदर्भात माहिती देत सूत्रसंचालन केले. मंडळ कृषी अधिकारी गोपाल गुजर यांनी दुग्ध व्यवसाय प्रक्रिया उद्योग संदर्भात माहिती दिली. कृषी पर्यवेक्षक संगीता उकर्डे सूक्ष्म सिंचनाचे महत्त्व सांगितले. यावेळी कृषी सहाय्यक गणेश देवळे.
कृष्णा गट्टूवार, विजय बागल, कृषी पदवीधर सुजाता चवरे, गावचे सरपंच जानीमिया, उपसरपंच नारायण घावटे, प्रगतशील शेतकरी शिवाजी घावटे, कैलास भाऊ मुळे, ज्ञानेश्वर मुळे, अमोल घावटे, प्रमोद घावटे, शिवाजी दंदाळे, दीपक दंदाळे, सचिन घावटे, ज्ञानेश्वर अहिरे कृषी मित्र अंगद घावटे, धोंडिराम पडोळ आगाखान संस्था प्रतिनिधी तसेच गावकरी उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.