
Nashik News : जिल्ह्यात एक महिन्यापासून पावसाने दांडी मारली आहे. त्यामुळे खरिपातील पेरण्या काही ठिकाणी हातातून गेल्या आहेत. पाऊस नाही तर विहारीत पाणी नसल्याने जनावरांसाठी नपणी व चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
एक महिन्याच्या प्रदीर्घ खंडानंतर शनिवार (ता. २) रोजी जिल्ह्यात पावसाची पुन्हा हजेरी लावली. निफाड, सटाणा, चांदवड, देवळा यासह सिन्नर व मालेगाव तालुक्यात पाऊस आल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
निफाड तालुक्यातील पश्चिम भागात नांदुर्डी, देवपूर, कसबे सुकेणे, पालखेड, पिंपळस, पिंपळगाव निपाणी, तळवाडे या गावात पाऊस झाला. नांदूर्डी व देवपूर परिसरात द्राक्ष बागेतून पाणी वाहिले. काही ठिकाणी पिकांची अल्पशी भरणी झाली आहे. तर चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव सह पूर्व गावांमधील पावसाने दिलासा दिला आहे.
काही गावात शिडकावा झाला. त्यामुळे दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पाऊस नसल्याने जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामध्ये द्राक्ष छाटणी कामकाज विस्कळीत होण्याचे सावट होते. चांदवड तालुक्यात अगाप खरीप कांदा लागवडी पूर्ण करण्यात अडचणी होत्या.
तर जनावरांच्या चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी पिके करपली आहे. मात्र पाऊस आल्याने पिकांना जीवदान मिळेल, मात्र उत्पादन निम्म्यावर घटणार असल्याचे शेतकऱ्यांनी कळविले आहे.
कळवण तालुक्यात दुपारी ४ वाजेनंतर पाऊस सुरू झाला. मात्र हलक्या सरी बरसल्या आहेत. सटाणा तालुक्यातील करंजाड खोरे परिसरात हलका पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर काहीसे हसू आले आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.