
पुणेः मॉन्सूनने (Monsoon Update) रविवारी उर्वरित महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचा (Monsoon Withdrawn) निरोप घेतला. तसचं राज्यात पावसाचीही उघडीप पाहायला मिळाली. पुढील पाच दिवस राज्यात पावसाचा जोर कमीच राहील, असा अंदाज हवामान विभागानं (Weather Update) जाहीर केलाय.
देशात २९ मे रोजी दाखल झालेल्या माॅन्सूनने तब्बल ४ महिने २५ दिवस मुक्काम केल्यानंतर संपूर्ण देशाचा निरोप घेतला. यंदा केरळमध्ये २९ मे रोजी दाखल झालेल्या माॅन्सूनने १६ जून रोजी महाराष्ट्र व्यापला. २ जुलै रोजी राजस्थानसह संपूर्ण देशभरात मॉन्सून दाखल झाला.
वायव्य भारतात २ महिने १८ दिवस मुक्काम करत मॉन्सूनने २० सप्टेंबर रोजी राजस्थान, कच्छ मधून परतीचा प्रवास सुरू केला. परतीचा प्रवास काहीसा अडखळत करत अखेर रविवारी मॉन्सून उर्वरित महाराष्ट्रासह देशातून परतला. यंदा मॉन्सून हंगामात देशात सरासरीपेक्षा ६ टक्के अधिक पाऊस पडला. तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा २३ टक्के अधिक पाऊस झाला.
देशातून माॅन्सून बाहेर पडल्यानंतर पावसानंही उघडीप दिली. राज्यात रविवारी जोरदार पावसाची नोंद झाली नाही. काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या. मात्र बहुतेक मंडळांमध्ये उघडीपच होती, असं म्हणावं लागेल. मागील काही दिवसांपासून राज्यात पावसानं धुमाकूळ घातला होता. त्यामुळं सोयाबीन आणि कापूस पिकाला मोठा फटका बसला. काढणीला आलेलं सोयाबीन पावसामुळं काढण शक्य नव्हतं. सतत पडणाऱ्या पावसानं शेतात वाफसा नव्हती.
मात्र आता पुढील पाच दिवस पावसाची उघडीप राहील, असा अंदाज हवामान विभागानं जाहीर केलाय. राज्यात पावसाची उघडीप राहील्यास शेतकरी सोयाबीन काढणीच्या कामाला गती येणार आहे. राज्यात शुक्रवारपर्यंत पावसाची उघडीप राहणार आहे, असा अंदाजही हवामान विभागानं जाहीर केलयं.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.