Sindhudurg News : जिल्ह्यातील किनारपट्टी भागातील हापूसच्या झाडांना ऐन पावसाळ्यात मोहोर आणि फळधारणा झाली आहे. क्षारयुक्त वारे आणि या वर्षी झाडांना बसलेला अतिरिक्त ताण यामुळे झाडांना मोहोर येण्याचे प्रमाण वाढले आहे. पावसामुळे हा मोहोर टिकविणे आंबा बागायतदारांसमोर आव्हान ठरणारे आहे.
किनारपट्टी भागात दरवर्षी जून-जुलैमध्ये काही झाडांना मोहोर येतो. परंतु या वर्षी मोहोर येण्याचे प्रमाण वाढले आहे. जुलैमध्ये मुसळधार पाऊस पडल्यानंतर ऑगस्ट महिना पूर्णतः कोरडा गेला. विशेषतः किनारपट्टीच्या तालुक्यांमध्ये पंधरा ते सतरा दिवस अजिबात पाऊस झाला नव्हता.
एकीकडे पाऊस नव्हता तर दुसरीकडे कडक ऊन त्यामुळे झाडांच्या मुळातील ओलावा कमी झाला होता. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून या भागात पावसाच्या सरी कोसळल्या. सायंकाळच्या वेळेत हलक्या सरी बरसत होत्या.
त्यामुळे रात्रीच्या वेळी गारवा निर्माण झाला होता. त्याचा परिणाम या भागातील हापूस आंब्याची अनेक झाडे ऐन पावसाळ्यात मोहोरली असून, काही झाडांना फळधारणा देखील झालेली दिसून येत आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.