
Akola Agriculture News : महाबीज हे शेतकऱ्यांचा विश्वास दृढ करणारे बियाणे आहे. ४७ व्या वर्धापनदिनी हा विश्वास अधिक दृढ व्हावा. येत्या काळात तो उत्तरोत्तर वृद्धिंगत व्हावा, अशी अपेक्षा राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) वर्धापन दिनानिमित्त येथील मुख्यालयात सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. या वेळी कुलगुरू डॉ. शरद गडाख, व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे, संचालक वल्लभराव देशमुख, डॉ. रणजित सपकाळ आदी उपस्थित होते.
श्री. सत्तार म्हणाले, ‘‘बियाणे बाजारात शेतकऱ्यांना हमखास खात्रीचे बियाणे उपलब्ध व्हावे या हेतूने महाबीजची वाटचाल सुरू आहे. गेल्या ४७ वर्षांत हा विश्वास अधिक बळकट केला आहे. तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि सक्षम करण्यात महाबीजचा मोलाचा वाटाआहे.
बियाणे क्षेत्रातील तंत्र हे सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे, अशी सूचनाही त्यांनी केली. कार्यक्रमात गुणवंत बीजोत्पादक शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे केले. डॉ. प्रफुल्ल लहाने यांनी आभार मानले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.