
Chhatrapati Sambhaji Nagar Latest News : मराठवाड्यातील ७४९ लघू प्रकल्पा पाणीसाठा जवळपास तळाला गेल्याची स्थिती आहे. या सर्व लघू प्रकल्पांमध्ये केवळ ८ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. ८६ लघू प्रकल्प कोरडे पडले आहेत, तर ३३६ प्रकल्पांमधील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. याशिवाय १७ मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा ही जोत्याखाली असून, अकरा मोठ्या प्रकल्पांपैकी चार प्रकल्पांमधील पाणीसाठा २५ टक्क्यांच्या आत आला आहे.
कोरड्या पडलेल्या लघू प्रकल्पांमध्ये छत्रपती संभाजीनगरमधील ७, बीडमधील ३२, लातूरमधील १२, धाराशिवमधील ३५, लघू प्रकल्पांचा समावेश आहे. दुसरीकडे जोत्याखाली पाणीसाठा गेलेल्या लघू प्रकल्पांमध्ये छत्रपती संभाजीनगरमधील ४७, जालन्यातील ३८, बीडमधील ५३, लातूरमधील ४५, धाराशिवमधील ८६, नांदेडमधील ३४, परभणीतील १४, तर हिंगोलीतील १९ लघू प्रकल्पांचा समावेश आहे.
तब्बल २६५ लघू प्रकल्पात २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा असून, ५४ लघू प्रकल्पात २५ ते ५० टक्के, तर ६ लघू प्रकल्पात ५० ते ७५ टक्के व केवळ दोन लघू प्रकल्पात ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. ७५ माध्यम प्रकल्पांपैकी ३६ मध्यम प्रकल्पात २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा असून, २० लघू प्रकल्पात २५ ते ५० टक्के, दोन लघू प्रकल्पात ५० ते ७५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
अकरा मोठ्या प्रकल्पांपैकी जायकवाडी प्रकल्पात २७ टक्के, येलदरीमध्ये ५६ टक्के, माजलगावमध्ये १८ टक्के, मांजरामध्ये २० टक्के, उर्ध्व पेनगंगामध्ये ४२ टक्के, निम्न तेरणामध्ये ३० टक्के, निम्नमनारमध्ये ३३ टक्के, विष्णुपुरीमध्ये ४२ टक्के, निम्न दुधनांमध्ये २६ टक्के, तर सीना कोळेगाव प्रकल्पात उणे ४ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
२६ टक्के उपयुक्त पाणीसाठा...
मराठवाड्यातील ८७७ लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह गोदावरी, तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील बंधाऱ्यांमध्ये केवळ २६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामध्ये ११ मोठ्या प्रकल्पात ३२ टक्के, ७५ माध्यम प्रकल्पात १७ टक्के, ७४९ लघू प्रकल्पात केवळ ८ टक्के, गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यांमध्ये ३२ टक्के, तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २७ बंधाऱ्यांमध्ये २० टक्के शिल्लक असलेल्या उपयुक्त पाणीसाठ्याचा समावेश आहे.
लघू प्रकल्पांची स्थिती...
लघू प्रकल्पांपैकी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९७ लघू प्रकल्पात ८ टक्के, जालनामधील ५७ प्रकल्पात सात टक्के, बीडमधील १२६ प्रकल्पात ९ टक्के, लातूरमधील १३४ प्रकल्पात दहा टक्के, धाराशिवमधील २०६ प्रकल्पात सात टक्के, नांदेडमधील ८० प्रकल्पात १७ टक्के, परभणीतील २२ प्रकल्पात ९ टक्के, तर हिंगोलीतील २७ प्रकल्पात केवळ दोन टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.