Water Crisis : राज्यात ४२६ टॅंकरने पाणीपुरवठा

Water Shortage : पावसाळा सुरू होऊन जवळपास वीस दिवस होत आले आहेत. तरीही राज्यात पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात पाणी टंचाई वाढल्याची स्थिती आहे.
Water Shortage
Water Shortage Agrowon

Pune News : पावसाळा सुरू होऊन जवळपास वीस दिवस होत आले आहेत. तरीही राज्यात पावसाने दमदार हजेरी लावलेली नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात पाणी टंचाई वाढल्याची स्थिती आहे.

सध्या राज्यात ५४७ गावे व १४०४ वाड्यावस्त्यांवर ४२६ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. येत्या काळात जोरदार पाऊस न झाल्यास पाणी टंचाई आणखी तीव्र होऊन टँकरच्या संख्येत वाट होण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी याच कालावधीत ५९१ गावात व १३१२ वाड्यावर वस्त्यांवर ५०१ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत होता. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत ७५ टँकरने घट झाली असल्याचे समोर आले आहे. राज्यात गेल्या आठवड्यात ५१५ गावांत आणि १२४६ वाड्यावस्त्यांवर ३८१ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. त्यानंतर या संख्येत मात्र झपाट्याने वाढ झाली आहे.

Water Shortage
Water Shortage : भूगर्भातील पाणी पातळी खालावली

मागील काही वर्षांत मराठवाड्यात पाणी टंचाईच्या चांगलीच वाढत होती. परंतु गेल्या दोन ते तीन वर्षांपासून मराठवाड्याच्या बहुतांश भागात चांगला पाऊस होत असल्याने टंचाई कमी होण्यास मदत झाली आहे. या भागातील ३६ गावे व १८ वाड्यावस्त्यांवर अवघ्या ४९ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. तर औरंगाबाद, बीड, परभणी, लातूर उस्मानाबाद, लातूर भागात अजूनही टँकर सुरू झाले नसल्याची स्थिती असून जालना, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत टँकर सुरू आहेत.

Water Shortage
Water Shortage : पुणेकरांनो पाणी जपून वापरा, १८ धरणांनी गाठला तळ

विदर्भातील अमरावती विभागात गेल्या वर्षी कमीअधिक पाऊस झाला होता. त्यामुळे या भागात पाणीटंचाई कमीअधिक असल्याने अमरावती विभागात ३७ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. नागपूर विभागात अजूनही टँकर सुरू झालेले नाहीत. मध्य महाराष्ट्रात पावसाळ्यात चांगला पाऊस झाला होता.

मात्र, होणारा अधिक उपसा आणि उन्हाची वाढती तीव्रता यामुळे टँकरच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येते. नाशिक विभागातील ९९ गावे व १७२ वाड्या वस्त्यांवर १०२ टँकर, तर पुणे विभागातील १०९ गावे व ४४४ वाड्यावस्त्यांवर ८६ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. ठाणे विभागातील २७० गावे व ७७० वाड्यावस्त्यांवर सर्वाधिक १५२ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

जिल्हानिहाय टँकरची संख्या

ठाणे ४६, रायगड ४७, रत्नागिरी २०, पालघर ३९, नाशिक ५७, जळगाव २९, नगर १६, पुणे ४१, सातारा ४०, सांगली १, कोल्हापूर १, जालना ३३, हिंगोली १२, नांदेड ४, अमरावती १३, वाशीम १, बुलडाणा १९, यवतमाळ ४.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com