Nana Patole : भाजपच्या हुकूमशाहीला संपवू ः नाना पटोले

Maharashtra Politics News : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून घाणेरडे राजकारण सुरु आहे. ईडी, सीबीआय या सरकारी यंत्रणांची भीती दाखवून विरोधी पक्ष संपवण्याचे गलिच्छ राजकारण सुरू आहे.
Nana Patole
Nana Patole Agrowon
Published on
Updated on

Mumbai News : ‘‘भाजपला पराभवाची भीती सतावू लागल्याने दडपशाहीच्या मार्गाने पक्ष फोडले जात आहेत. महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून घाणेरडे राजकारण सुरु आहे. ईडी, सीबीआय या सरकारी यंत्रणांची भीती दाखवून विरोधी पक्ष संपवण्याचे गलिच्छ राजकारण सुरू आहे.

लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. भाजपच्या या हुकूमशाही प्रवृत्तीला संपवण्याचा संकल्प करण्यात आला आहे,’’ अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पटोले यांच्या अध्यक्षतेखाली गरवारे क्लब हाऊस येथे झाली. या वेळी विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, तेलंगाणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, बस्वराज पाटील, आमदार प्रणिती शिंदे, माजी मंत्री सतेज पाटील उपस्थित होते.

Nana Patole
Nana Patole : शेतकरीविरोधी धोरणांमुळेच भाजपचा पराभव : पटोले

बैठकीनंतर पटोले म्हणाले, ‘‘भाजपच्या सत्तापिपासू राजकारणावर बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. या प्रवृत्तीशी सर्वजणांनी एकत्रितपणे लढा देण्यावर चर्चा झाली. पंतप्रधान मोदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ७० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे जाहीरपणे आरोप करतात आणि त्यांनाच सन्मानाने सरकारमध्ये सामावून घेत मंत्रिपदे देतात. भ्रष्टाचाराबद्दल पंतप्रधान मोदींचे खायचे दात व दाखवायचे दात वेगळे आहेत. नरेंद्र मोदी व भाजप भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण देत आहे.’’

‘‘समृद्धी महामार्गावर बस अपघातात २६ लोक होरपळून मेले. त्यांचा अंत्यविधी होत असताना राजभवनात मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचा जयघोष करताना भाजपच्या लोकांना जराही लाज वाटली नाही,’’ अशी टीका पटोले यांनी केली.

Nana Patole
Nana Patole : कायदा सुव्यवस्था राखण्यात सरकार अपयशी

‘शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाजप बोलत नाही’

पटोले म्हणाले, ‘भाजप सरकार जनतेच्या प्रश्नावर बोलत नाही. शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे आहे. महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. भाजपचे केंद्रातील व राज्यातील सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. काँग्रेस पक्ष जनतेचे प्रश्न घेऊन राज्यातील जिल्ह्या-जिल्ह्यांत विविध आंदोलने करणार आहे. भाजपचा खरा चेहरा उघडा करणार आहे.’’

आघाडी बळकट : थोरात

बाळासाहेब थोरात म्हणाले,‘‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून काही लोक गेले असले तरी त्याचा आमच्या आघाडीवर काहीही परिणाम झालेला नाही. उलट आघाडी आणखी बळकट झाली आहे. विधानसभेत आम्ही सर्वजण एकत्रितपणे आणखी चांगले काम करू. पण राज्यात जे राजकारण सुरु आहे ते मात्र महाराष्ट्राच्या जनतेला आवडलेले नाही. जनता भाजपच्या या राजकारणाला आगामी निवडणुकीत धडा शिकवेल.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com