
Solapur News : खरिपाची पिके तर पावसाअभावी वाया गेलीच आहेत. आता रब्बीची पेरणी तोंडावर आली तरीही ढगाळ वातावरणापलिकडे कोणतेही आशादायी चित्र दिसत नाही.
यामुळे आगामी काळात वैरणीशिवाय जिल्ह्यातील पशुधन कसे वाचवावे याची चिंता बळीराजाला लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आवडत्या पोळा सणावर दुष्काळाचे सावट आहे.
सध्या जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने सर्वच पिकांची वाढ खुंटलेली दिसून येत आहे. मुग, उडीद व सोयाबीन काही ठिकाणी फुलोरा अवस्थेत असून सध्यस्थितीत पावसाची गरज आहे. पावसाचा ताण पडल्यामुळे फुलोरा व कळी गळून पडत आहेत. पावसाचा पडलेल्या खंडामुळे पीक वाढीवर व उत्पन्नावर दुष्परिणाम होत आहे.
पंतप्रधान पीक विमा योजनेच्या ता. २६ जूनच्या शासननिर्णयानुसार २५ टक्के पीक विमा देण्यासाठी विमा क्षेत्रघटकातील रॅडम पद्धतीने निवडलेल्या १० गावातील अधिसूचित पिकांच्या महसूल मंडळ व तालुका एकूण पेरणी क्षेत्रांपैकी पाच टक्के क्षेत्राचे नजरअंदाज सर्व्हे झालेले आहे. जिल्ह्यातील एकूण ९१ महसूल मंडळापैकी ६६ महसूल मंडळात २१ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाऊस न पडल्यामुळे ड्राय स्पेल लागू झालेला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.