
Jalkot News : पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून मदत दिली जाणार आहे. शेतकऱ्यांनी हिम्मत न हरता जोमाने कामाला लागावे, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे प्रतिपादन क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी आज केले.
अतनूर, रावणकोळा, मरसांगवी येथील अतिवृष्टी भागातील शेतीच्या बांधावर जाऊन त्यांनी नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. त्यावेळी शेतकऱ्यांना संवाद साधताना ते बोलत होते.
मंत्री बनसोडे यांनी अतनूर, रावणकोळा भागातील अतिवृष्टीमुळे खरोखर नुकसान झाले असून प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाचा अहवाल तयार केला आहे. शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून दहा हजार रुपये दिले जात आहे. शेतकऱ्यांना येणाऱ्या काळात ज्या सुविधा द्यायच्या आहेत, त्या सुविधा देण्यात येणार आहे.
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे असून शेतकऱ्यांनी न घाबरता जोमाने कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी केले. त्याचबरोबर अतिवृष्टीमध्ये अतनूर, रावणकोळा भागातील रस्ते खरडून गेले असून त्याचे कामही तातडीने सुरु करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहे.
अनेक ठिकाणचे पुले वाहून गेल्यामुळे नागरिक व शेतकऱ्यांना अडचण निर्माण होऊन नये, यासाठी ते कमी वेळात ते काम पूर्ण करण्याच्या सूचना देऊन शेतकरी, महिला, नागरिक यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडचणी सोडविण्याचे प्रयत्न यावेळी मंत्री बनसोडे यांनी केले.
यावेळी उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार सुरेखा स्वामी, गटविकास अधिकारी नरेंद्र मेडेवार, तालुका कृषी अधिकारी आकाश पवार, पोलिस निरीक्षक सुनील बिर्ले, काँग्रेसचे नेते मन्मथ किडे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष अर्जुन आगलावे, सभापती विठ्ठल चव्हाण, संग्राम हासुळे, रामराव राठोड, महताब बेग, अरविंद नागरगोजे, सत्यवान दळवे, सत्यवान पांडे पाटील, चंद्रशेखर पाटील, आदींसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.