
Sindhudurg News : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आतापर्यंत १०२ गावांतील ९४६ शेतकऱ्यांच्या ३०० हेक्टरवरील भातपिकाला फटका बसला आहे. जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल्यामुळे या नुकसानीचे पंचनामे रखडले होते. दरम्यान नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू होता. सतत पडणाऱ्या पावसामुळे नदीकाठच्या शेकडो गावांतील शेतीमध्ये पाणी शिरले. भातरोप पुनर्लागवड केलेल्या क्षेत्रात अनेक दिवस पाणी साचल्यामुळे या पिकांचे मोठे नुकसान झाले.
कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक सर्व्हेक्षणात आतापर्यंत १०२ गावांतील ९४६ शेतकऱ्यांच्या ३०० हेक्टर क्षेत्रावरील भातपिकांचे नुकसान झाले आहे.
या पिकांचे नुकसान झाले असले तरी अजूनही कृषी विभागाला नुकसानीचे पंचनामे करता आले नव्हते. सतत पडणाऱ्या पावसामुळे पंचनाम्यांच्या कामात अडथळा निर्माण झाला होता.
सद्यःस्थितीत ३०० हेक्टरवर नुकसान दिसत असले तरी शेकडो हेक्टरवर पिके अजूनही पाण्याखाली आहेत. त्यामुळे नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पाऊस ओसरल्यानंतरच नुकसानीचा आकडा निश्चित होईल.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.