
Nandurbar News : हातनूर धरणाच्या जलाशयात वाढ झाल्याने शनिवारी (ता.१६) सकाळी नऊला धरणाचे ४१ दरवाजे पूर्ण क्षमतेने उचलून त्याद्वारे चार लाख २३ हजार ३५६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीत सोडण्यात आला.
त्यामुळे सारंगखेडाचे २२, तर प्रकाशा प्रकल्पाचे २४ गेट पूर्ण क्षमतेने उचलण्याच्या प्रक्रियेला सुरवात झाली असून, सध्या एक लाख ३८ हजार ८२३ क्यूसेक विसर्ग केला जात आहे.
तो रविवारी (ता. १७) सकाळी सहाला वाढून प्रकाशा बॅरेजमधून चार लाख क्यूसेक विसर्ग सुरू राहील. त्यामुळे तापी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
तापी नदीच्या उगमस्थानासोबतच हतनूर (जि. जळगाव) धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने जलाशयात वाढ झाली.
त्यामुळे १६ सप्टेंबरला सकाळी नऊला धरणाचे ४१ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले. त्यातून चार लाख २३ हजार ३५६ पाण्याचा विसर्ग तापी नदीत सोडण्यात आला. त्यानुसार तापीवरील सुलवाडे बॅरेजचे द्वार उचलणे प्रक्रियेला सुरवात झाली. दुपारी दोनला गेट पूर्ण क्षमतेने टप्प्याटप्प्याने उघडण्यात येत आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.