
Raigad News : आठवडाभरापूर्वी पडलेल्या मुसळधार पावसाने उरण तालुक्याला गेल्या अक्षरशः झोडपून काढले होते. या पावसामुळे तालुक्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असल्याने हजारो हेक्टर क्षेत्रातील भातशेती पाण्याखाली आली होती. त्यामुळे रोपे कुजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
उरण तालुक्यातील पुनाडे, सारडे, पिरकोन, वशेणी, गोवठणे, पाले, आवरे, कडापे,पानदिवे, कोप्रोली, खोपटे, कळंबुसरे, चिरनेर भोम,कंठवली, विंधणे इत्यादी ग्रामीण भागातील शेतात पाणी साचले आहे.
उशिरा झालेला पाऊस यामुळे करपलेली पिके, त्यांनतर दुसऱ्यांदा लावणी केलेली भाताची रोपे पाण्याखाली असल्याने छोट्या रोपांना सूर्यप्रकाश मिळाला नसल्याने भाताची रोपे कुजून वाया गेली आहेत.
यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उरणमध्ये आठवड्याभरापासून जोरदार पाऊस पडत आहे. अशातच गेल्या तीन चार दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्याने शेतात साचलेल्या पाण्यामुळे रोपांना यांचा फटका बसल्याने त्याचा परिणाम उत्पन्नावर होणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे, शेतकऱ्यांनी दुसऱ्यांदा केलेली पेरणी पिके कुजल्यामुळे आता पुन्हा बी-बियाणांची जमवा-जमव करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आल्याने शासनाने तात्काळ पंचनामा करून मदत करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.