
Kolhapur News : जिल्ह्यात बुधवारी (ता. २६) सायंकाळपासून पावसाने पुन्हा सुरुवात केली. गुरुवारी (ता. २७) जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच राहिली. राधानगरी धरणाचे पाणी पंचगंगा नदीत येण्यास प्रारंभ झाल्याने नदीच्या पातळीत गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत किंचित वाढ दिसून आली. पंचगंगा नदीची पाणीपातळी गुरुवारी दुपारी दोनपर्यंत ४०.७ फूट होती. जिल्ह्यातील ८२ बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत.
राधानगरी धरणाचे चार दरवाजे खुले होते. त्यातून ७००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. पावसाचे प्रमाण कमी जास्त होत असल्याने नद्यांचे पाणी धीम्या गतीने वाढत असल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांनी स्थलांतराला सुरुवात केली नव्हती.
सर्वाधिक फटका बसणाऱ्या शिरोळ तालुक्यातही अद्याप कुणीच स्थलांतरास प्राधान्य दिले नाही. मात्र प्रशासनाने निवाऱ्याची व्यवस्था केली आहे. ग्रामस्थांनी तातडीने स्थलांतराला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले आहे.
वारणा (चांदोली) धरणातूनही पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्याने वारणा नदीचे पाणीही वाढण्याची शक्यता निर्माण झाले. कृष्णा नदीच्या पाणीपातळीत मात्र अत्यंत धीम्या गतीने वाढ होत असल्याने कृष्णा काठची चिंता सध्या तरी कमी आहे.
पण अन्य नद्यांचे पाणी वाढत असल्याने पुराची धास्ती मात्र कायम असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील धरणांचा सरासरी साठा ७५ टक्यांचा झाला आहे. दूधगंगा ५४ तर तुळशी धरणाचा पाणीसाठा ५८ टक्के झाला आहे. इतर सर्व धरणात सरासरी ८० टक्क्यांपर्यंत साठा झाला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.