
रत्नागिरी ः गेले चार दिवस जिल्ह्यात परतीच्या पावसाने (Heavy Rainfall) धुमाकूळ घातला होता. रविवारी (ता. १६) सायंकाळी पडलेल्या पावसामुळे भातशेतीला (Paddy Farming) फटका बसला आहे. लांजा तालुक्यातील पालु येथे काजळी नदीचे (Kajli River) पाणी वाढल्यामुळे भातशेतीचे नुकसान झाले.
गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने लांजा तालुक्यात धुमाकूळ घातला आहे. तयार झालेली भात पिके शेतातच उभी आहेत. पावसामुळे भात पीक कापायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
परतीच्या पावसाने लांजा तालुक्यातील पूर्व भागाला जोरदार दणका दिला. सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास कोसळलेल्या जोरदार पावसामुळे येथील काजळी नदीला आलेल्या पुराचे पाणी थेट येथील शेतकऱ्यांच्या शेतात घुसले.
त्यामुळे तयार झालेले भात पीक हे पूर्णपणे पुराच्या पाण्याने आडवे झाले असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा पाऊस सायंकाळी सहा वाजेपर्यंत जोरदार कोसळत होता. भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम कृषी विभागाकडून सुरू आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.