
परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक मंडलांत २५ दिवसांहून अधिक पावसाचा खंड (Long Periods Of Rain) पडला आहे. परिणामी, हजारो हेक्टरवरील खरीप पिके करपून (Crop Burning) गेली आहेत. शेंगा भरण्याच्या अवस्थेत पाणी न मिळाल्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात (Soybean Production) मोठी घट येणार आहे. कपाशी (Cotton), तूर तसेच इतर पिकांच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. पिके हातची गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने तत्काळ अधिसूचना काढावी. विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम विमाभरपाई देण्याचे आदेश विमा कंपनीला द्यावेत, अशी मागणी केली आहे. परभणी जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा १६८.३ मिलिमीटर एवढा कमी पाऊस झाला.
परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यांतील अनेक मंडलांत २५ पेक्षा जास्त दिवस खंड पडला आहे. तापमानात वाढ झाली आहे. उन्हाचा चटका वाढला आहे. जमिनीतील ओलावा नष्ट झाला आहे. हलक्या, बरड, मुरमाड, माळरानाच्या जमिनीवरील पिकांची पाने, फुले, शेंगा करपून गेली आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.