
Parnbhani News परभणी, हिंगोली जिल्ह्यांत गुरुवारी (ता. २७) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत ६६ मंडलांत वादळी पाऊस झाला. अनेक मंडलांत गारपीट झाली. परभणी जिल्ह्यात वीज कोसळून २ जणांचा मृत्यू झाला.
तर ३ जण जखमी झाले. या शिवाय ४२ जनावरेही दगावली. यंदा एप्रिल महिन्यात वादळी पावसाने कहर केला आहे. उशिरा पेरणी केलेली रब्बी ज्वारी, हळद, केळी आंबा, कांदा, भाजीपाला पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेली आहेत.
बुधवारी (ता. २६) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास धनगर टाकळी (ता. पूर्णा) शिवारात वीज कोसळल्यामुळे लिंबाच्या झाडाखाली थांबलेले विठ्ठल कोकरे (वय २९) यांचा मृत्यू झाला. तर अन्य एक जण जखमी झाला.
जिंतूर तालुक्यातील पांगरी शिवारात वीज कोसळून एका १७ वर्षांच्या मेंढपाळाचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे जण जखमी झाले. जिंतूर तालुक्यात ४० लहान जनावरे, तर पाथरी आणि पालम तालुक्यांत प्रत्येकी १ अशी एकूण ४२ जनावरे दगावली.
परभणी जिल्ह्यातील ३७ मंडलांत, तर हिंगोली जिल्ह्यातील २९ मंडलांत पाऊस झाला. हिंगोली, कळमनुरी, औंढा नागनाथ तालुक्यांतील अनेक मंडलांत गारपीट झाली. त्यामुळे पिके मातीमोल झाली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.