
Nashik News सटाणा, मालेगाव तालुक्यांत शनिवारी (ता.८) दुपारी साडेतीननंतर वादळी वाऱ्यासह पावसाने (Nashik Rainfall) हजेरी लावली. तसेच गारपिटीने (Hailstorm) दाणादाण उडविली. ऐन सुगीच्या दिवसांत पुन्हा शेतकऱ्यांच्या कष्टाची अस्मानी संकटाने माती केली आहे.
यामध्ये उन्हाळ कांद्यासह गहू, हरभरा, डाळिंब, आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नांदगाव तालुक्यात गारपिटीने कांद्याला मोठा फटका बसला आहे. मका पीक आडवे झाले आहे. यामुळे शेतकरी पुन्हा उध्वस्त झाला आहे.
सटाणा तालुक्यातील पिंगळवाडे, आखतवाडे, बिजोटे, आसखेडा, निताने, भुयाने परिसराला गारपिटीने झोडपले. अनेक भागात गारांचा खच साचला. १५ मिनिटे झालेल्या जोरदार गारपिटीमुळे सबकेन झालेल्या द्राक्ष बागांचे तर काढणीसाठी आलेल्या उन्हाळ कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले.
पंचनामे करण्याची मागणी
कसमादे भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने नुकसान भरपाई द्यावी व त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे, यासाठी तत्काळ यंत्रणेला सूचना देऊन पंचनामे करावेत, अशी मागणी भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष कृष्णा भामरे यांनी केली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.